HW News Marathi
राजकारण

फडणवीस पवारांची राजकीय जुगलबंदी

औरंगाबाद । “खरिपाची पिके उद्ध्वस्त झाली असताना सरकार अजूनही गाजर दाखविण्याचे काम करत आहे. झोपेचे सोंग घेतलेल्या या सरकारला अजून किती आत्महत्या हव्या आहेत”? असा सवाल महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्र्वादीचे नेते अजित पवार यांनी विचारला. राष्ट्रवादीकडून औरंगाबाद येथे संविधान बचाव रॅली करण्यात आली होती, त्यावेळी पवार बोलत होते.

सामान्य माणसांची जाण नसलेल्या सरकारला उलथून टाकल्याशिवाय शांत बसायचे नाही,त्याशिवाय आपल्या देशात चांगले दिवस येणार नाहीत.असा टोला अजित पवारांनी सरकराला लगावला आहे. प्रश्न सोडवता येईनात आणि मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, की 2019 ला मीच मुख्यमंत्री, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र सोडले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तुमचा आशीर्वाद मिळाला तर लोकार्पणसुद्धा मीच करेन !

News Desk

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाचे गणेश पूजन

News Desk

पर्रिकरांच्या मृत्यूनंतर अशी विधाने करणे योग्य नाही, मुख्यमंत्र्यांची पवारांवर टीका

News Desk
राजकारण

सरसंघचालक मोहन भागवतांवर ‘मोक्का’ लावा !

Gauri Tilekar

मुंबई | राष्ट्रीय स्वसंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावर मोक्का कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केली आहे. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी आझाद मैदानात धरणे आंदोलन केले होते. या देशाचा कायदा कोणालाही शस्त्र बाळगण्याची परवानगी देत नाही, मग संघाकडे एके 47 रायफल कशी आली ?, असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी देवेंद्र फडणवीस सरकारला केला आहे.

प्रकाश आंबेडकर म्हणाले, आरक्षणाच्या नावावर जिल्ह्याजिल्ह्यांत दंगली घडवल्या जात आहेत. दोन दिवस कर्फ्यू असताना संघाने रस्त्यावर बंदुका नाचवल्या होत्या. संघाकडे ही हत्यारे आली कुठून याचा शोध घ्यावा. कोणाकडे शस्त्रे सापडली की त्याच्यावर अतिरेकी कायद्यांतर्गत कारवार्इ केली जाते. त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यावरही मोक्का अंतर्गत कारवार्इ करा. जर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने जमा केलेला शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला नाहीतर कोर्टात जाऊ आणि रस्त्यावर उतरून मोर्चा काढू असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.

देशाच्या संरक्षणासाठी भूदल, नौदल आणि वायूदल आहे. राज्यात संरक्षणासाठी पोलिस आहेत. मग संघ प्रतिसैन्य कशासाठी उभारत आहे? असा सवालही आंबेडकरांनी केला आहे. ते म्हणाले, या प्रतिसैन्याकडे असलेली शस्त्रास्त्रे पोलिसांनी ताब्यात घेतली नाही तर महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन केले जाईल. संघाच्या लोकांकडे शस्त्रास्त्रे सापडत आहेत. मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांचे एके 47 या रायफलसह फोटोही समोर आले आहेत. प्रशासनाने ही हत्यारे काढून घेतली नाहीत, तर राज्यातील सर्व रस्ते बंद करू, असा इशारा त्यांनी या वेळी दिला आहे.

कायद्यानुसार मोहन भागवत यांच्यावर मोक्का उपस्थित केला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे इतका मोठा शस्त्रसाठा कसा आला, याचा शोध घेण्याची गरज आहे. परंतु, तो घेतला जात नाही. सरकार सध्या ऑक्सिजनवर असून चार राज्यांच्या निवडणुकानंतर ते व्हेंटिलेटरवर जार्इल, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.

Related posts

#LokSabhaElections2019 : अयोध्येतून होणार प्रियांका गांधींच्या रथयात्रेला सुरुवात

News Desk

EVMHacking : गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूची ‘रॉ’कडून चौकशी करा !

News Desk

महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांची पुस्तके द्यायला हवीत !

News Desk