HW News Marathi
राजकारण

शेतक-यांचे आंदोलन राजकीय आंदोलन नाही | शरद पवार

मुंबई | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत शेतक-यांनी संप पुकारला आहे. त्या पार्श्वभूमीवर अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडले आहे. पवार यांनी आपल्या ट्विटर हॅंडलच्या माध्यमातून ट्विट करत शेतक-यांप्रती भावना व्यक्त केल्या आहेत .

शरद पवार यांनी ट्विट मध्ये बळीराजा काही सुखासुखी रस्त्यावर येत नाही. त्याला अडचणींना सामोरे जावे लागत आहे, व्यवसाय करणे अशक्य झाले आहे, तो कर्जबाजारी झाला आहे, आत्महत्यांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तो टोकाची भूमिका घेत आहे. समाजातील इतर घटकांनी शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे रहावे. हे काही राजकीय आंदोलन नाही असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

पवारांच्या या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रीया दिल्याचे पहायला मिळत आहे. या आंदोलनात सर्वसामान्यांना त्रास होईल असे कोणतेही काम करू नये. हा संघर्ष आता प्रश्न सुटेपर्यंत थांबवायचा नाही. राज्य आणि केंद्र सरकारने त्यांचा शब्द पाळला नाही. तो पाळण्याची त्यांची नियतही दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता टोकाची भूमिका घ्यावी. असे आवाहन पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून शेतक-यांना केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नाना पटोले यांचा पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

“कोणता गुन्हा आणि कृत्य केले की फडणवीसांना त्यांचे मन खाते”, संजय राऊतांचा उलट सवाल

Aprna

राज्यातील जनतेची निराशा करणारे अधिवेशन-धनंजय मुंडे

swarit