HW News Marathi
राजकारण

जात पडताळणी प्रमाणपत्रामुळे पाच नगरसेवक येणार अडचणीत

मुंबई | सहा महिन्यांच्या आत जर निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपले जात पडताळणी प्रमाणपत्र निवडणूक आयोगाकडे जमा न केल्यास निवडणून आलेल्या नगरसेवकांचे नगरसेवक पद रद्द करण्यात येईल असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे महापालिकेतील ५ नगरसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

आज दि २५ ऑक्टोबरला दुपारी 3 च्या दरम्यान मुंबई उच्चन्यायालयात न्यायमुर्ती बी आर गवई आणि एन एस कर्णिक यांच्या खडपीठात ५ नगरसेवकाच्या विरोधात सुनावणी करणार आहेत. या सुनावणी नंतर काँग्रेसच्या आणि भाजपच्या असे मिळून ५ नगरसेवकांना आपले पद सोडावे लागणार आहे. या निर्णयाचा ७ नगरसेवकांना फटका बसला असता परंतु त्यामधील २ नगरसेवकांचे पद लघुवाद न्यायालयाने आधीच रद्द केले आहे. या ५ नगरसेवकांना पदावरून काढणार आहेत तर २०१७ च्या पालिका निवडणूकित शिवसेनेच्या, काँग्रेसच्या आणि समाजवादी पार्टीच्या नगरसेवकांना यावर्षी संधी मिळणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ममता बॅनर्जी पंतप्रधानपदासाठी उत्तम उमेदवार !

News Desk

मी स्वतः ‘झेडपी’च्या शाळेत शिकलो, शरद पवारांकडून शालेय आठवणींना उजाळा

News Desk

INX Media Case: पी. चिदंबरम यांची रवानगी तिहार तुरुंगामध्ये नाही

News Desk
मनोरंजन

आश्विन अमावस्येलाच का होते लक्ष्मीपूजन !

News Desk

आश्विन अमावस्येला लक्ष्मीपूजन हा सण साजरा केला जातो. या दिवशी संध्याकाळी लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे,लक्ष्मी स्थिर रहावी म्हणून करतात. त्याने लक्ष्मी स्थिर राहते असा समज आहे. अनेक घरांत श्रीसूक्तपठणही केले जाते. व्यापारी लोकांच्या हिशोबाचे नवीन वर्ष (विक्रमसंवत्) लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

प्राचीन काळी या रात्री कुबेरपूजन करण्याची रीत होती. कुबेर हा शिवाचा खजिनदार आणि धनसंपत्तीचा स्वामी मानला जातो. दीपप्रज्वलन करून यक्ष आणि त्यांचा अधिपती कुबेराला निमंत्रित करुन पूजणे हा मूळचा सांस्कृतिक कार्यक्रम होता. परंतु गुप्तकाळात वैष्णव पंथाला राजाश्रय मिळाल्याने आधी कुबेराबरोबरच लक्ष्मीचीही पूजा होऊ लागली.भारतात, विविध ठिकाणी झालेल्या उत्खननात कुशाण काळातील अनेक मूर्ती सापडल्या आहेत. त्यांमध्ये कुबेर आणि लक्ष्मी एकत्र दर्शविले आहेत. काही मूर्तींमध्ये कुबेर त्याची पत्‍नी इरितीसह दाखविला आहे. यावरून असे दिसते की प्राचीन काळी कुबेर आणि त्यांची पत्‍नी इरिती यांची पूजा केली जात असावी. कालांतराने इरितीचे स्थान लक्ष्मीने घेतले आणि पुढे कुबेराच्या जागी गणपतीला प्रतिष्ठित केले गेले.

अलक्ष्मी म्हणून ज्या देवतेला मध्यरात्री हाकलून देण्याची प्रथा आहे, तीच खरी या सणाची इष्ट देवता असल्याचेही म्हटले जाते. तिला ज्येष्ठा, षष्टी वा सटवी, निर्ऋती या नावांनीही ओळखतात. निर्ऋती ही सिंधू-संस्कृतीतील मातृदेवता समजली जाते. तिला ब्राह्मणी संस्कृतीने अलक्ष्मी म्हणून तिरस्कारले असले तरी ती राक्षसांची लक्ष्मी आहे असे देव मानत असल्याचे उल्लेख दुर्गासप्तशतीमध्ये आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी व नीती ‘ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्त्वाची मूल्ये मनात रुजतात, म्हणून या पूजेची विशेषता आहे. भगवान महावीर मोक्षाला गेल्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी महावीरांचे प्रमुख शिष्य गौतम गणधर यांना केवल ज्ञान प्राप्त झाले म्हणूनच दिवाळीच्या संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते ते संपत्तीरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी नव्हे, तर मोक्ष-लक्ष्मी किंवा आत्मकल्याणरूपी लक्ष्मी मिळवण्यासाठी. गणधर त्यांचा दिव्य-ध्वनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवितात. दिवाळीसाठी पूर्वी जमिनीवर आणि राजस्थानातील प्रथेप्रमाणे तांदळाच्या ओल्या पिठाची रांगोळी काढतात. त्याला ‘मांडणे’ असे म्हणतात. त्यावर पाट मांडून लक्ष्मीपूजन किंवा ओवाळणे आदी विधी केले जातात.

Related posts

काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानला ५ वर्षाची शिक्षा 

News Desk

डॉ. अब्दुल कलामांचा असा होता कार्यकाळ…

News Desk

महात्मा गांधींना नोबेल का मिळाला नाही ?

News Desk