HW News Marathi
राजकारण

दाल में कुछ काला है!

इंदूर | मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने मनमोहन सिंग हे इंदूरमध्ये आले आहेत. त्यावेळी मनमोहन यांनी राफेल डीलवरून मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटले की, ‘दाल में कुछ काला हैं, देशवासीयांच्या मनात राफेल डीलबद्दल शंका आहेत. या डीलची चौकशीसाठी विरोधकांनी संयुक्त संसदीय समितीची मागणी केलेली आहे’. परंतु मोदी सरकार यासाठी तयार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मोदी सरकार दरवर्षी २ कोटी तरुणांना रोजगार देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु मोदी सरकारने हे आश्वसन पुर्ण केले नाही. या मुद्द्यांवरून मध्य प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी आलेले मनमोहन सिंग यांनी पत्रकार परिषदेत ते बोलत असताना त्यांनी सरकारवर अनेक प्रश्न उपस्थित केले आहे. पुढे असे देखील म्हटले की, भाजपच्या राष्ट्रीय महासचिव कैलास विजयवर्गीय यांनी मनमोहन सिंग हे रिमोट कंट्रोलनं चालणारे पंतप्रधान होते, अशा शब्दांमध्ये यांच्यावर टीका केली होती.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेठीत राहुल गांधी राम तर मोदी रावणाच्या रुपातील पोस्टर वॉर

swarit

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

भाजपच्या नेत्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होणार नाहीत !

News Desk
महाराष्ट्र

अंघोळीची गोळी संस्थेला ‘दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर

Gauri Tilekar

पुणे | दिव्या फाऊंडेशन, बुलढाणा यांच्या वतीने महाराष्ट्रामध्ये विविध क्षेत्रात समाजभान जपणाऱ्या तरुणाईला दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार देण्यात येत असतो. प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत ही तत्व स्वीकारून पुण्यातील अंघोळीची गोळी ही संस्था पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन या विषयावर सातत्याने काम करत आहे. याच कामांची दखल घेत दिव्या फाऊंडेशन, बुलडाणा यांच्या वतीने देण्यात येणारा दिव्यरत्न राज्यस्तरीय जीवनगौरव पुरस्कार यावर्षी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेला नुकताच जाहीर झाला आहे. महाराष्ट्रातील पाणी बचत आणि वृक्ष संवर्धन करणाऱ्या या तरूणाईचा होणार गौरव होणार आहे.

झाडांना देखील संवेदना असतात त्यामुळे झाडांना ठोकले जाणारे बॅनर, पोस्टर आणि खिळे काढण्याची अनोखी मोहीम अंघोळीची गोळी या संस्थेने सुरु केली होती. अगदी अल्पावधीतच ही मोहीम व्यापक पद्धतीने महाराष्ट्रभर पसरली होती. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात विविध सामाजिक संस्था आणि युवकांच्या गटांच्या मदतीने खिळेमुक्त झाडे ही मोहीम आज सुरु आहे. पुण्याच्या माधव पाटील यांनी सुरु केलेली अंघोळीची गोळी ही संस्था सध्या प्रेम, बंधुभाव, त्याग आणि बचत या तत्वांचा प्रसार करून पाणी बचत आणि वृक्ष संवर्धनासाठी काम करत आहे.

“पुरस्कार मिळाल्याचा आनंद नक्कीच आहे मात्र पर्यावरण संवर्धनाच्या कामात सर्वसामान्य जनतेने उतरणे अत्यंत आवश्यक आहे. पण त्याचबरोबर पर्यावरणपुरक जीवनशैलीचा अंगिकार करणे ही देखील प्रत्येकाची जबाबदारी आहे,” असे मुंबईच्याअंघोळीची गोळी टीम म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरांवर १ जानेवारी हा दिवस अंघोळीची गोळी म्हणजेच पाणी बचत करण्याचा दिवस म्हणुन साजरा व्हावा यांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले.

Related posts

१०० % उपस्थितीती अनिवार्य असणाऱ्या कार्यालयामध्ये दिव्यांग अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात उपस्थित राहण्यास सूट

News Desk

अत्याचारांना जागीच प्रतिबंध करणाऱ्या ‘निर्भया’ पथकांमुळे महिला सुरक्षिततेला अधिक बळकटी! – उद्धव ठाकरे

Aprna

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी कालवश

News Desk