HW News Marathi
राजकारण

सीबीएसई, आयसीएसईच्या विद्यार्थ्यांचे अकरावी प्रवेश लेखी गुणांच्या आधारे व्हावेत !

मुंबई | “राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. त्याच पध्दतीने सीबीएसई व आयसीएसई या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा. मात्र, त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नयेत, अशी सूचना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली आहे.

“राज्य मंडळाच्या दहावीच्या निकालात विद्यार्थ्यांना अंतर्गत गुण देण्यात आले नसल्याने अकरावी प्रवेशावेळी सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे अंतर्गत गुण गृहीत न धरता केवळ लेखी परीक्षेचे गुण गृहीत धरावेत. त्या गुणांच्या आधारवर अकरावीचे प्रवेश देण्यात यावे”, अशी सूचना विनोद तावडे यांच्या कनिष्ठ महाविद्यालयांचे मुख्याध्यापक आणि पालक यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर करण्यात आली आहे.

“मुख्याध्यापक आणि पालक यांनी दिलेल्या या सूचनेसंदर्भात राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करुन लवकरच निर्णय घेण्यात येईल. दोन्ही मंडळांच्या विद्यार्थ्यांच्या लेखी परीक्षेचे गुण अकरावी प्रवेशासाठी गृहीत धरल्यास, विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया समान पातळीवर आणता येईल, असा विचार मुख्याध्यापक आणि पालकांनी आज झालेल्या बैठकीत मांडला”, असे तावडे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

हनुमानाची जात सांगणे पडणार महागात

News Desk

शीख दंगली प्रकरणी सज्जन कुमार यांना जन्मठेप

News Desk

तीन वर्षात महाराष्ट्रात स्त्रीभ्रृण हत्येचं प्रमाण वाढले- सुप्रिया सुळे

swarit
महाराष्ट्र

१४ जूनला होणार राज्याच्या मंत्रिमंडळाचा विस्तार

News Desk

मुंबई | गेल्या अनेक दिवसांपासून फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अखेर या मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख ठरली आहे. येत्या १४ जूनला फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात एकूण सात जागा भरल्या जातील, अशीही माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार निश्चितपणे पावसाळी अधिवेशनापूर्वी होणार असल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी (९ जून) दिल्लीत बोलताना दिले होते. तर “येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल”, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देखील नुकतेच सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी (११ जून) दुपारी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या चार बंडखोर नेत्यांसोबत चर्चा झाली. रणजितसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, अब्दुल सत्तार, कालिदास कोळंबकर यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर आता राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगत आहेत. या ४ नेत्यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील तसेच अन्य जणांना या मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपद मिळण्याची शक्यता असल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे शिवसेनेच्या एकाच आमदाराला मंत्रीपद मिळणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Related posts

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर!

News Desk

रामा पोतरेंच्या कुटबियांना ५ लाखाचा धनादेश

News Desk

माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची तब्येत बिघडली, AIIMS मध्ये केले दाखल

News Desk