HW News Marathi
राजकारण

गिरीराज सिंह यांना वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी निवडणूक आयोगाकडून नोटीस

पाटणा | भाजपचे वरिष्ठ नेते आणि बेगुसरायचे उमेदवार गिरिराज सिंह हे नेहमीच वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत. सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाने पुन्हा चर्चेत आले आहेत. गिरीराज सिंह यांनी २४ एप्रिल रोजी बेगुसरायमधील जीडी महाविद्यालयात हे वक्तव्य केले होते. दरभंगाचे राजदचे उमेदवार अब्दुल बारी सिद्दिकी यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला होता त्यावर सिंह यांनी प्रसार माध्यमांना यासंदर्भात प्रतिक्रिया देतान वादग्रस्त विधान केले होती. सिंहा यांच्या या विधानानंतर बिहारचे विरोधी पक्षांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने सिंह यांना नोटिस पाठवून याप्रकरणी उत्तर देण्यास सांगितले आहे.

गिरीराज सिंह एका सभेत म्हणाले होते की, “जे लोक वंदे मातरम म्हणत नाहीत ते आपल्या मातृभुमीची पूजा कशी काय करू शकतात? माझ्या वडिलांचा आणि आजोबांचा मृत्यू गंगेच्या किनारी झाला होता आणि त्यांना कबरची गरज नव्हती. परंतु ‘त्या’ लोकांना मृत्यूनंतरही तीन हात जमीन लागते. नंतरही तुम्ही असेच वागणार असाल तर देश तुम्हाला कधीच माफ करणार नाही.”

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पलूस-कडेगाव पोटनिवडणुकीतून भाजपाची माघार

News Desk

#RamMandir : काँग्रेसने पाठिंबा दिला तर २ मिनिटांमध्ये अयोध्येत राम मंदिर बनेल !

News Desk

फक्त राज्यमंत्री पद देऊन तोंडाला पाने पुसण्यात आली !

News Desk