HW News Marathi
राजकारण

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरकारने केली दिलगिरी व्यक्त

मुंबई | विधानपरिषदेचे पहिले विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार न झाल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी निदर्शनास आणून दिले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधान परिषदेत सरकारवर दिलगिरी व्यक्त करण्याची वेळ ओढवली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरवात झाली आहे. या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्ष नेत्यांनी सरकारला लक्ष्य केले आहे. सभागृह नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरी व्यक्त करत याबाबत चौकशी अहवाल सभागृहात मांडणार असल्याचे सांगितले आहे.

अधिवेशनादरम्यान विधानभवनात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हा शोकप्रस्ताव मांडण्यापूर्वीच माजी विरोधी पक्षनेते कॉम्रेड माधवराव गायकवाड यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात न आल्याची बाब सरकारच्या लक्षात आणून दिली. त्याचप्रामणे सरकारने याबाबत माफी मागावी. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम मंदिरासाठी कायदा करा, सरसंघचालक भागवतांचे वक्तव्य

News Desk

आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आव्हान

News Desk

आपले राजकीय मतभेद असतील पण आम्ही सूडाने वागणारे नाही !

News Desk