HW News Marathi
राजकारण

राजेश कुंटेंच्या याचिकेवर 10 ऑगस्टला होणार सुनावणी

मुंबई | लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भिवंडीत 6 मार्च 2014 रोजी राहुल गांधी यांनी महात्मा गांधीजींची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेच घडवून आणली, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याविरोधात आरएसएसचे शहरजिल्हा कार्यवाहक राजेश कुंटे यांनी भिवंडी न्यायालयात अवमान याचिका दाखल केली होती.

या याचिकेवर भिवंडी कोर्टात आज सुनावणी ठेवण्यात आली होती. या सुनावणी साठी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी मंगळवारी मुंबईत उपस्थित आहेत. संबंधित याचिकेवर सुनावणी देताना न्यायालयाने पुढील सुनावणी 10 ऑगस्टला होणार असल्याचे सांगितले आहे . सुनावणीनंतर माध्यमांशी बोलताना राहुल यांनी विचारधारेसाठी माझी लढाई सुरु आहे आणि सुरुच राहील अशी प्रतिक्रीया दिली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपला चढलेली सत्तेची मस्ती जनतेनेच उतरवयाला हवी | सुप्रिया सुळे

Gauri Tilekar

उद्योग गुंतवणुकीवर मुख्यमंत्र्यांनी समोरासमोर डिबेटला यावे; आदित्य ठाकरेंचे ओपन चॅलेंज

Aprna

राफेल विमानावरून पवारांचा युटर्न

News Desk
राजकारण

वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर

News Desk

नवी दिल्ली | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना मूत्रसंसर्ग झाला असुन दिल्लीतील ‘एम्स’ने मेडिकल बुलेटीन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी डिमेंशिया म्हणजेच स्मृतीभ्रंश या आजाराने ग्रस्त आहेत. ते 2009 सालापासून आजारी असून त्यांना चालण्या-फिरण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागतो.

गेल्या अनेक वर्षांपासून ते कोणत्याही सभेत किंवा भाजपच्या कार्यक्रमात दिसलेले नाहीत. वाजपेयींची प्रकृती सध्या स्थिर असुन वाजपेयींना सध्या ताप किंवा रक्तदाबाचाही त्रासही नाही. त्यांना उद्या सकाळी डिस्चार्ज दिला जाईल, असे बोलले जात आहे. मात्र यावर रुग्णालयाने अधिकृत रीत्या काहीही जाहिर केलेले नाही.

दरम्यान, केंद्रीय मंत्री अरुण जेटली सर्जरीनंतर अजूनही ‘एम्स’मध्येच असुन रुग्णालयात एकच व्हीव्हीआयपी रुम आहे. त्यामुळे त्यामुळे वाजपेयींना क्रिटिकल केअर युनिट म्हणजेच सीसीयू मध्ये ठेवण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एम्स’मध्ये जाऊन वाजपेयींच्या प्रकृतीची विचारपूस केल असुन मोदींच्या अगोदर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री विजय गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी यांच्यासह अनेक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली आहे.

Related posts

#RamMandir : विधानसभेच्या आचारसंहितेमुळे राम मंदिरासाठी कायदा करण्यास अडचण !

News Desk

लोकसभेच्या निकालानंतर प्रथमच राज ठाकरेंनी घेतली पवारांची भेट

News Desk

दिव्यांगांच्या कार्यक्रमात भाजपच्या बाबुल सुप्रीयो यांची एकाला ‘पाय तोडण्याची’ धमकी

News Desk