HW News Marathi
राजकारण

उच्च न्यायालयाकडून शरद पवारांना दिलासा

मुंबई | माथाडी कामगारांना दोन वेळा मतदान करण्याचे आवाहन केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्ष अध्यक्ष शरद पवार काही दिवसांत वादात सापडले होते. या वादात उच्च न्यायालयाने सध्या पवारांना दिलासा दिला आहे.

शरद पवारांविरोधात दाखल केलेली याचिका सुनावणी घेण्यास योग्य नाही, असे न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने सांगितले आहे. याचिकाकर्त्यांनी संबंधित विभागाकडे दाद मागावी, असे त्यांनी स्पष्ट केल्याने याचिका मागे घेण्यात आली आहे.

दरम्यान, निवडणुका दोन वेगवेगळ्या तारखांना आहेत. त्यामुळे आधी गावाला आणि नंतर कामाच्या ठिकाणी असे दोनदा मतदान करा, असे वक्तव्य पवारांनी केले होते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

RamMandir : अयोध्येत कडक पोलीस बंदोबस्त

News Desk

कश्मीरात जो हिंसाचार, दहशतवाद आणि फुटीरतावाद बोकाळला आहे त्यास एकटा सिद्धू जबाबदार नाही | ठाकरे

News Desk

‘पवार साहेबांच्या गुप्‍त भेटीवेळी २००० साल का आठवलं नाही’

News Desk
शिक्षण

भगवद्‌गीता वाटपाचे परिपत्रक मागे ?

News Desk

मुंबई | मुंबईतील सर्व अशासकीय अनुदानित महाविद्यालयांना भगवतगीता वाटपाचे परिपत्रक मागे घेण्याचे आश्वासन मुंबईच्या उच्च शिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. रोहिदास काळे यांनी छात्र भारती विद्यार्थी संघटनेला आज दिले आहे. उच्च शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे मुंबईतील विद्यार्थी संघटना आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे गुरुवारी भगवतगीतेचे वाटप त्वरीत बंद करण्यात आले आहे, असे सहसंचालक डॉ रोहिदास काळे यांनी मुंबईतील विद्यार्थी संघटनांना सांगितले.

नॅक मुल्यांकन प्राप्त महाविद्यालयांना भगवत गीता या धार्मिक ग्रंथाचे विद्यार्थ्यांना वाटप करण्याचे आदेश उच्च शिक्षण संचालयाने दिले होते. याबाबतच्या सूचना संबंधित महाविद्यालयांना देण्यात आल्या होत्या. त्यावर आक्रमक पवित्रा घेत महाराष्ट्रातील विद्यार्थी संघटनांनी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री यांच्याकडे निषेध नोंदविला होता. संबंधित प्रकरणाबाबत या संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

या बाबत बोलताना मुंबई छात्रभारतीचे अध्यक्ष सचिन बनसोडे म्हणाले, धर्मग्रंथाला विरोध असण्याचे कारण नाही. धर्म ही एक सभ्यता आहे आणि प्रत्येकाने ती खाजगीबाब म्हणून पाळावी. सार्वजनिक ठिकाणी तीचे प्रदर्शन करु नये. भगवतगीतेलाही विरोध असण्याचे कारण नाही. त्यातील भल्याबुऱ्या गोष्टींवर अनेक शतके चर्चा सुरु आहे, सुरु राहील. परंतु या वादात सरकारने पडू नये. तसेच कुठल्या एका धर्माच्या कट्टरवाद्यांना खुश करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आयुष्यांशी आणि घटनेच्या अस्तित्वाशी खेळू नये, असा खोचक इशारा छात्र भारतीचे मुंबई अध्यक्ष सचिन बनसोडे यांनी शिक्षण विभागाला दिला.

Related posts

महिला वॉर्डननेच केला विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार

swarit

विना अनुदानित दिव्यांग शाळांच्या शिक्षकांचे आमरण उपोषण

News Desk

माजी सैनिकांच्या दोन पाल्यांना शिक्षणासाठी १२ हजार रुपयाची आर्थिक मिळणार

News Desk