HW News Marathi
राजकारण

कॉंग्रेसची ऐतिहासिक पत्रकार परिषद

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. राहुल गांधी यांची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद झाली. राहुल गांधींची पत्रकार परिषद सुरू होण्याआधीच संपली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कारण राहुल यांची पत्रकार परिषद केवळ 2 मिनिटे 47 सेकंद चालली.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवरुन पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. या पावणे तीन मिनिटात राहुल यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. मोदी सरकार देशातील गरिबांची लूट करते आहे तसेच श्रीमंतांचे खिसे भरण्याचे काम करत असल्याचा आरोप यावेळी राहुल गांधींनी केला. मुख्य म्हणजे केवळ दोन मिनिट 47 सेकंद चाललेल्या या पत्रकार परिषदेत राहूल गांधींनी एकाच प्रश्नाचे लांबलचक उत्तर दिले आणि पत्रकार परिषद संपवली.

केवळ काही मिनिटांच्या या पत्रकार परिषदेसाठी राहुल गांधी यांनी जवळपास तासभर पत्रकारांना थांबवून ठेवले. यामुळे जमलेल्या पत्रकारांनी यावेळी एकत्र येवून फोटो काढले तसेच हॅश टॅग वापरत फोटो सोशल मिडीयावर टाकत पत्रकारांनी नाराजी देखील व्यक्त केली आहे. जनते प्रमाण कॉंग्रेस अध्यक्षांवर माध्यम प्रतिनिधी देखील नाराज झाल्याचे चित्र आज मुंबईत पहायला मिळाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि धनुष्यबाणावर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

Aprna

भाजप वेगळ्या विदर्भाची मागणी का करत नाही – भाजप आ. डाॅ. आशिष देशमुख

News Desk

मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो !

News Desk