HW News Marathi
राजकारण

दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही

मुंबई | सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, शेतमालाला भाव, वनजमिनींचं हस्तांतरण अशा मागण्यांसाठी निघालेले शेतकरी आज विधानसभेला घेराव घालणार आहेत. सरकारने देखील उशिरा का होईना मंत्री गटाची स्थापना करत शेतकरी आंदोलकांशी बोलण्याची तयारी दर्शवली आहे. दरम्यान, आता कितीही गोळ्या झाडल्या तरी लेखी आश्वासन मिळेपर्यंत माघार नसल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

या वेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शेतकरी मोर्च्याला आपला पाठिंबा दाखवत त्यांच्याशी ते बोलत होते. दुसऱ्यांच्या आंदोलनाला स्वत:चं आंदोलनं म्हणणं मला मान्य नाही. तेव्हा मी तुमचं दर्शन घ्यायला येथे आलो आहे. शेतकऱ्यांनो तुमच्या आंदोलनाला माझा पूर्ण पाठिंबा आहे . या सरकारच्या हातून तुमच्या मागण्या पूर्ण होणार नाही असे दिसून येत आहे.

तुम्ही माझ्याकडे वीस मागण्या केल्या आहेत . मी ही तुमच्याकडे एक मागणी करतो . माझ्या हातात एकदा सत्ता देऊन पहा असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमय्या मैदानावर शेतकरी मोर्चात सहभागी शेतकऱ्यांसमोर बोलताना केले.

दरम्यान नाशिकमधून निघालेले लाल वादळ म्हणजेच शेतकरी, शेतमजूर, कष्टकऱ्यांचा लाँग मार्च आज पहाटेच्या सुमारास मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाला आहे. सामान्य मुंबईकर तसेच परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होवू नये यासाठी पहाटेच लाँग मार्च आझाद मैदानावर आला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शहांसाठी ठाकरे गुजरातमध्ये दाखल, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण

News Desk

आमची ५ वर्षे विरोधकांची रखडलेली काम करण्यातच गेली !

News Desk

#Results2018 : चंद्रशेखर राव ५० हजार मतांनी विजयी

News Desk