HW News Marathi
राजकारण

मी सदैव लोकांबरोबर अन् लोकांसाठी कार्यरत राहीन !

मुंबई | यंदाच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले. महाराष्ट्रात देखील आघाडीला अनपेक्षित धक्का बसला. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा दारुण पराभव झाला. यामुळे पवार घराण्याला प्रथमच पराभव पाहायला मिळाला. दरम्यान, आपल्या पराभवानंतर प्रथमच पार्थ पवार यांनी प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. “फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, असे ट्विट करत पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

“मावळमधील मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल आणि महाआघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमासाठी मी त्यांचे आभार मानतो. फक्त एका निवडणुकीसाठी नाही तर मी सदैव लोकांबरोबर आणि लोकांसाठी कार्यरत राहीन”, असे ट्विट पार्थ पवार यांनी केले आहे. या लोकसभा निवडणुकीत शिवसेना उमेदवार श्रीरंग बारणे यांनी राष्ट्रवादीचे नवखे उमेदवार पार्थ पवार यांचा तब्बल २ लाख मतांनी पराभव केला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिग्विजय सिंह यांची काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार; जाणून घ्या कारण…

Darrell Miranda

मी निवडणूक जिंकणारच आहे, तुमच्याशिवाय किंवा तुमच्यासोबत !

News Desk

राज्यातील रस्त्यांवरील खड्ड्यांवरुन मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले

News Desk