HW News Marathi
राजकारण

आता पुढची २० वर्षे मीच खासदार राहणार !

अहमदनगर | “तुमची कामे करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या. तुमची कामे पूर्ण होणार यात शंकाच बाळगू नका. कारण आता पुढची २० वर्षे अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचा खासदार मीच राहणार आहे”, असा दावा भाजपचे अहमदनगरचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला आहे. नगरमधील एका विकासकामांच्या उदघाटन कार्यक्रमात सुजय विखे पाटील बोलत होते. दरम्यान, सुजय विखे-पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात अनेक उलट सुलट चर्चा रंगू लागल्या आहेत.

“तुमची कामे जर पूर्ण करायची असतील तर पुन्हा मलाच निवडून द्या. कामे करताना विखे-पाटलांचा शब्द हा महत्त्वाचा असतो. आम्ही कधीही फक्त कागदावर आश्वासन देत नाही. म्हणूनच मी तुम्हाला जे कोणतेही आश्वासन देत आहे ते काम पूर्ण होणारच. त्यात कोणत्याही प्रकारची शंका बाळगू नका”, असेही सुजय विखे पाटील यावेळी म्हणाले. “तुमची कामे पूर्ण करायची असतील तर मलाच निवडून द्या. कारण पुढची २० वर्षे मीच खासदार राहणार आहे”, असा दावा त्यांनी यावेळी केला.

अहमदनगरमधून काँग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे लोकसभेच्या तोंडावर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविली. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांचा पराभव करून सुजय विखे पाटील अहमदनगर मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने निवडून आले. मात्र आता अहमदनगरचे विद्यमान खासदार असलेले सुजय विखे पाटील पुढची २० वर्षे देखील आपणच खासदार राहणार असा दावा करत आहेत. त्यांचा हा दावा त्यांचा अती आत्मविश्वास असल्याची टीका देखील सध्या त्यांच्यावर होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

काँग्रेसची आठवी यादी जाहीर, नांदेडमधून अशोक चव्हाण पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

News Desk

अशा ठिकाणी वार केला कि पाकिस्तानची बोलती बंद झाली !

News Desk

हसन मुश्रीफ यांची ED च्या छापेमारीवर पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

Aprna