HW News Marathi
राजकारण

भाजपमध्ये प्रवेश करण्याच्या चर्चेवर विश्वजीत कदम यांचा खुलासा

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमधील अनेक नेते भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि काँग्रेसचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम (vishwajeet kadam) भाजपच्या वाटेवर असल्याच्या सुरू आहेत. अशोक चव्हाण भाजपमध्ये आले तर १५ आमदार घेऊन यावे, अशी अट भाजपकडून ठेवण्यात आल्याच्या चर्चा सुद्धा राजकीय वर्तुळात रंगल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर विश्वजीत कदमांनी पलूस तालुक्यातील अंकलखोप विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या शताब्दी सोहळ्यात  एका सभेत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले आहे. यावेळी विश्वजीत कदम म्हणाले, “काही लोकांचा माझ्यावर लक्ष्य आहे. त्यामुळे काही चर्चा घडवून आणल्या जात आहेत. मात्र एक नक्की सांगतो की, कोणतीही वेगळी भूमिका मी घेणार नाही किंवा कोणत्याही वेगळ्या विचारात मी नाही. माझ्या सर्व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी  निश्चित राहावे.” असे म्हणत त्यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम  दिला आहे.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या विधानपरिषद निवडणुकीतही काँग्रेसच्या अंतर्गत मतभेद असल्याचे आपल्याला पाहायला मिळाले. विधानसभेत शिंदे सरकारच्या बहुमत चाचणीवेळी सुद्धा काँग्रेसचे अनेक आमदार अनुपस्थित राहले होते. यावेळी अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केलेल्यामुळे काँग्रेसचे आमदार फुटल्याच्या चर्चेला उधाण आले होते. आता येत्या काळात भाजपमध्ये काँग्रेस किंवा इतर पक्षातील कोणते माजी मंत्री, आमदार, नेते आदी लोक जातील, हे पाहावे लागेल.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवसेना आणि धनुष्यबाणावर पुढील सुनावणी शुक्रवारी होणार

Aprna

ममताजी, तुम्ही सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत !

News Desk

मुख्यमंत्र्यांचा औरंगाबाद दौरा वादळी ठरणार ?

News Desk