HW News Marathi
राजकारण

बाळासाहेब असते तर त्यांना युतीच्या निर्णयाने निश्चितच आनंद झाला असता !

मुंबई | “भाजप-सेनेच्या युतीचा निश्चितच प्रचंड आनंद होत आहे. आम्ही कायमच हिंदूं एकत्र राहावेत आणि मराठी माणूस एकत्र राहावा यासाठी झटत आलो आहोत. मी उद्धव ठाकरे यांचा शतशः आभारी आहे कि त्यांनी एक चांगला निर्णय घेतला”, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी दिली आहे. यावेळी बाळासाहेब ठाकरेंबद्दल प्रश्न विचारला असता “बाळासाहेब असते तर त्यांना या युतीच्या निर्णयाने निश्चितच आनंद झाला असता”, असे मनोहर जोशी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (१८ फेब्रुवारी) संध्याकाळी घेतलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत भाजप-सेनेच्या युतीबाबत अधिकृत घोषणा केली. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-भाजपच्या युतीची अधिकृत घोषणा केली. युतीच्या निर्णयाबद्दल मनोहर जोशी यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राज्याच्या आरोग्य उपकेंद्रातील परिचारिकांना १० हजार रुपये मानधन दया !

News Desk

महाराष्ट्राची ‘हिंदी’पणाकडे वाटचाल, मनसेकडून राज्य सरकारचा निषेध

News Desk

उद्धव ठाकरे, संजय राऊतांसह राजेंद्र भागवत यांना पुसद न्यायालयाने जारी केले वॉरंट

News Desk