HW News Marathi
राजकारण

मोदी सरकार पुन्हा सत्तेत न आल्यास आपला देश ५० वर्षे मागे जाईल !

नवी दिल्ली | “आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे आवश्यक आहे. अन्यथा देश ५० वर्षे मागे जाईल”, असे भाकीत संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी केले आहे. “गेल्या ५ वर्षात मोदी सरकारने जे काम केले ते अतुलनीय आहे. जर मतदार या कामाचे योग्य मूल्यमापन करण्यास चुकले तर या देशाची मोठी हानी होईल”, असेही निर्मला सीतारामन यावेळी म्हणाल्या. त्या बंगळुरू येथे थिंकर फोरमच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

“देशाच्या आजपर्यंतच्या इतिहासात असे नेतृत्त्व देशातील नागरिकांना मिळालेले नाही. गेल्या ५ वर्षात भ्रष्टाचारचा एकही दाग मोदी सरकारवर लागलेला नाही. गेल्या ५ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही सुट्टी घेतलेली नाही. आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळून पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत न आल्यास देश ५० वर्षे मागे जाईल”, असेही निर्मला सितारमण यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अहमदनगरमधून सुजय विखे-पाटील यांनी दाखल केले ४ उमेदवारी अर्ज

News Desk

#MarathaReservation : जाणून घ्या… मराठा समाजाला आरक्षणाद्वारे कोणते लाभ मिळणार

News Desk

पाकिस्तानची आर्थिक रसद रोखणे हे महासत्तेला उशिरा सुचलेले शहाणपण !

News Desk