HW News Marathi
राजकारण

२०११ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या शासनाच्या निर्णयाची अंमलबजावणी करा !

मुंबई | महाराष्ट्र्र शासनाने २०११ सालापर्यंत झोपड्यांना कायदेशीर मान्यता देण्याच्या घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी मुंबई महापालिका, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, मुंबई महानगर विकास प्राधिकरण आणि सर्व शासनाच्या संबंधित विभागांनी तात्काळ करावी अशी सूचना रामदास आठवले यांनी केली आहे. रस्ते विकास, झोपडपट्टी पुनर्वसन, इत्यादी योजनांमध्ये २०११ सालापर्यंतच्या झोपड्यांना अधिकृत दर्जा देऊन त्यांचे पुनर्वसन करावे या शासनाच्या धोरणात्मक निर्णयाची संबंधित अधिकाऱ्यांनी अंमलबजावणी करावी असे देखील रामदास आठवले यांनी म्हटले आहे.

बांद्रा पूर्व येथील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या सभागृहात मुंबईतील विविध झोपडपट्ट्यांच्या प्रश्नांवर आठवले यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. सांताक्रूझ येथील भीमवाडा, खोतवाडी येथील प्रलंबित झोपडपट्टी पुनर्वसन योजना लवकर मार्गी लावावी यासाठी दीर्घ चर्चा करण्यात आली. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ विकसात बाधित होणाऱ्या झोपड्या, रेल्वे जमिनीवरील झोपड्या, कांदळवन वन विभागाच्या जमिनीवरील झोपड्यांच्या पुनर्वसनाबाबत यावेळी चर्चा झाली

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, पवई येथील आदिवासी पाड्यांमधील आदिवासी आणि बिगर आदिवासी झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाबाबत देखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. त्याचप्रमाणे मुंबईतील विक्रोळी येथील भीमछाया नगर, दहिसर येथील गणपत पाटीलनगर इत्यादी भागांत २०११ सालच्या शासन निर्णयानुसार त्यांना संरक्षण आणि नागरी सुविधा पुरविण्याबाबत या बैठकीत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘आम्ही नाही त्यातले’ अशी शिवसेनेची भूमिका !

News Desk

राहुल गांधी हातात मशाल घेऊन महाराष्ट्रात दाखल; आज ‘भारत जोडो यात्रे’चा असा आहे प्रवास

Aprna

चंद्रशेखर आझाद यांची सुटका करा | अविनाश महातेकर

News Desk