HW News Marathi
राजकारण

अल्पसंख्यांकांच्या एकजुटीचा नेता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होऊ शकतो !

कोलकाता | जर दलित, आदिवासी आणि अल्पसंख्यांक एकत्र आले तर या एकजुटीचा नेता पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री होऊ शकतो असे विधान रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. त्याचप्रमाणे यावेळी रिपब्लिकन पक्षाच्या निळ्या झेंड्याखाली पश्चिम बंगालमधील दलित आदिवासी आणि अल्पसंख्यांकांची एकजूट उभारावी असे आवाहनही त्यांनी केले आहे. ते कोलकाता येथील रिपाइंच्या जाहीर सभेत बोलत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटना समितीमध्ये निवडून आणण्यासाठी जोगेंद्रनाथ मंडल यांनी मोठे प्रयत्न केले होते. पश्चिम बंगालमधील दलितांनी डॉ. आंबेडकरांचा विचार जोपासल्याचा अभिमान असल्याचे यावेळी आठवले म्हणाले. पश्चिम बंगालमधील भूमिहीन दलितांना प्रत्येकी ५ एकर जमीन द्यावी अशी मागणी करत याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घ्यावा, असे आठवले यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे बांगलादेशी नामशुद्र दलितांना भारतीय नागरिकत्व देण्याबाबतचा ठराव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारत सरकारकडे पाठवावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बदनामीकारक वक्तव्य केल्याने अण्णा हजारेंची नवाब मलिक यांना नोटीस

News Desk

लाज कशी वाटत नाही ? हा प्रश्न काॅंग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांनाच विचारत आहेत !

News Desk

प्रसिद्ध गायक दलेर मेहंदींचा भाजपमध्ये प्रवेश, पंजाबमधून निवडणूक लढविण्याची शक्यता

News Desk