HW News Marathi
राजकारण

येत्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर लढणार?

लखनऊ । आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला शह देण्यासाठी काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष एकत्र येण्याच्या प्रयत्नात आहेत. परंतु, काँग्रेसचे महासचिव गुलाम नबी आझाद यांनी आगामी निवडणूका काँग्रेस स्वबळावर लढू शकते असे, म्हटल्याने महाआघाडीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पक्षासाठी झटून काम करणाऱ्यांनाच पद मिळणार

बाराबंकी येथे जीआयसी ग्राऊंडवर पार पडलेल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात आझाद यांनी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्यासाठी सक्षम असल्याचे म्हटले. ‘काँग्रेसने जरी महाआघाडीसाठी पुढाकार घेतला असला तरी आम्ही स्वत:च्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास तयार आहोत. तसेच पक्षासाठी झटून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पद दिले जाईल,’ असेही त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना सांगितले.

समाजवादी पक्ष काँग्रेसला राज्यातील केवळ रायबरेली आणि अमेठी या दोनच जागा देण्यासाठी तयार असल्यानेच इतर पक्षांवर दबाब टाकण्यासाठी आझाद यांनी स्वबळावर लढण्याचे वक्तव्य केले असल्याचे समजते.

राज बब्बर बरळले

यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले. ‘समाजवादी पक्षातील अंतर्गत वादात आम्ही नाक खुपसत नाही. ती काँग्रेसची संस्कृती नाही ही भाजपची विशेषतः पंतप्रधानांची सवय आहे. ते दुसऱ्यांच्या बाथरुममध्ये डोकावतात,’ असे ते म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘द अ‍ॅक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटावरून राजकारण पेटले

News Desk

“महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात सीमावादचे प्रकरण जिंकेल”, मुख्यमंत्र्यांचा विश्वास

Aprna

आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होणारच !

News Desk