HW News Marathi
राजकारण

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधींचे मराठीतून ट्विट

मुंबई | “छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन”, असे ट्विट करत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने राहुल गांधी यांनी शुद्ध मराठीतून केलेले हे ट्विट मोठा चर्चा विषय ठरत आहे.

शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. त्यांचे जीवन आणि राज्य कारभार हा संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे म्हणत राहुल गांधी यांनी महाराजांना अभिवादन केले आहे. दरम्यान, राहुल गांधींनी मराठीतून केलेले हे ट्विट महाराष्ट्राचे विशेषतः मराठी जनांचे मन जिंकण्याचा प्रयत्न नाही ना ?, असा सवालही सध्या राजकीय वर्तुळात विचारला जात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मध्य प्रदेश-मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

News Desk

निवडणुकांसाठी मोदींचे हे खालच्या पातळीचे राजकारण | निरुपम

Gauri Tilekar

“दसरा मेळावा घ्यायचा अधिकार हा आमचा”, शिंदे गटाचा दावा

Aprna