HW News Marathi
राजकारण

सिद्धिविनायक मंदीराच्या पोस्टल स्टॅम्पचे उद्घाटन

मुंबई। भारतीय डाक विभागातर्फे प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिराच्या तयार करण्यात आलेल्या पोस्टल स्टॅम्पचे आज (सोमवार) मंदिराच्या गाभाऱ्यात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार आले आहे. या प्रकाशन कार्यक्रमात श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यासह सर्व विश्वस्त, प्रधान सचिव आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर जनरल हरिश्चंद्र अग्रवाल हे उपस्थित होते.

दरम्यान, आज देशभरात इंधन दरवाढीच्याविरोधात काँग्रेससह इतर 21 पक्षांनीदेखील ‘भारत बंद’ची हाक दिली होती. या बंदच्या दरम्यान विशेषतः काँग्रेस आणि मनसेकडून अनेक ठिकाणी इंधन दरवाढीचा मोठ्या प्रमाणात निषेध करण्यात आला. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याकडून अंधेरी रेल्वेस्थानात रेल्वे बंद करण्याचे प्रयत्न झाले तर इंधन दरवाढीच्या निषेधार्थ मनसेकडून दादरमधील सेनाभावनासमोर महागाईची तिरडी काढून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

भाजपच्या मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने मात्र यात सावध भूमिका घेतल्याचे दिसते. सामनाच्या संपादकीयातून जरी सरकारच्या इंधन दरवाढीवर टीका करण्यात आली असली तरी विरोधकांकडून केल्या गेलेल्या भारत बंदला शिवसेनेकडून समर्थन मात्र नव्हते. याउलट श्री सिद्धिविनायक मंदिराच्या पोस्टल स्टॅम्पच्या प्रकाशनाच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री हे विरोधी पक्षांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’च्या दिवशी एकत्र दिसले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

देशभरात १३ राज्यांत ९७ जागांसाठी आज होणार मतदान

News Desk

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले भाजपमध्ये प्रवेश करणार ?

News Desk

शिक्षकांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ कधी मिळणार ?

News Desk
राजकारण

महाआघाडीमध्ये आता चंद्रबाबू नायडू यांचा समावेश

Gauri Tilekar

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्री तेलुगू देसम पार्टी(टीडीपी)चे अध्यक्ष चंद्रबाबू नायडू यांची भेट घेतली. अखेर काँग्रेस आणि तेलुगू देसम पक्ष या दोन्ही पक्षांकडून एकत्र येण्याची घोषणा करण्यात आली आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी आम्ही एकत्र येत असल्याचे या पक्षांनी म्हटले आहे. प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसोबत झालेल्या भेटीनंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

आगामी निवडणुकांमध्ये भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून महाआघाडीसाठी प्रयत्न सुरु आहेत. आता या महाआघाडीमध्ये तेलुगू देसम पार्टीचे अध्यक्ष चंद्रबाबू नायडूचंद्रबाबू नायडू यांचा समावेश झाला आहे.

राहुल गांधी आणि चंद्रबाबू नायडू यांच्या भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा न दिल्यामुळे आंध्राचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू एनडीएमधून बाहेर पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या दोघांमधील भेट झाली असल्याचे अंदाज व्यक्त केला जात होताच. त्याचप्रमाणे या दोन्ही पक्षांनी आता ते एकत्र येत असल्याची घोषणा केली आहे.

Related posts

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar

सत्ताधार्‍यांना हिंदुत्व आणि राममंदिरही नको झाले !

News Desk

काँग्रेसच्या जाहीरनाम्यासाठी रघुराम राजन करणार मदत ?

News Desk