HW News Marathi
राजकारण

आज सादर होणार राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प 

मुंबई । राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प हा आज (२७ फेब्रुवारी) रोजी सादर आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काही महत्त्वाचे मुद्दे मांडले होते. पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी, शेतकऱ्यांसाठीचा मदतनिधी, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, पीकविमा योजना इत्यादी मुद्दे मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत मांडले. आज सादर होणाऱ्या या अंतरिम अर्थसंकल्पामध्ये पुढील ३ महिन्यांच्या खर्चाचे नियोजन सादर केले जाणार आहे. विधानसभेत सुधीर मुनगंटीवार तर विधान परिषदेत दीपक केसरकर हा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पाबाबत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेले काही मुद्दे

  • राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मांडला जाईल.
  • या अधिवेशनात एकूण ११ विधेयके सादर केली जातील.
  • पुलवामा दहशतवादी हल्ल्यातील शहीदांच्या कुटुंबीयांना ५० लाख रूपयांचे सहाय्य राज्य सरकारने जाहीर केले आहे. त्यांच्या कुटुंबातील एकाला नोकरी देण्याचा निर्णय सुद्धा सरकारने घेतला आहे. सर्वच शहीदांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.
  • केंद्र सरकारच्या चमूने महाराष्ट्राला भेट देऊन ४७०० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे. एकूण ८२ लाख शेतकर्‍यांपैकी ४२ लाख शेतकर्‍यांच्या खात्यात आतापर्यंत दुष्काळी मदतीची रक्कम जमा झालेली आहे.
  • छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ५१ लाख शेतकर्‍यांच्या खात्यांसाठी २४ हजार कोटी रूपये बँकांना देण्यात आले असून, १८ हजार कोटी रूपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत. आदिवासींचे खावटी कर्ज सुद्धा राज्य सरकारने माफ केले आहे.
  • पीकविमा योजनेंतर्गत गेल्या १५ वर्षांत १.२६ कोटी शेतकर्‍यांना २९०० कोटी रूपये लाभ मिळाला तर आता अवघ्या ४ वर्षांत १३,१३५ कोटी रूपये शेतकर्‍यांना प्राप्त झाले आहेत. विविध प्रकारच्या कीडींच्या प्रादुर्भावासाठी सुद्धा ३३३६ कोटी रूपये शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत.
  • एकूण ३ टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, आतापर्यंत २० हजारांहून अधिक गावांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. चारा, पाणी याची कुठेही कमतरता राहू नये, याची पूर्ण काळजी सरकारतर्फे घेतली जात आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वरळीत गल्लीगल्लीत फिरायला लावणार, पण विजय माझाच होणार! – आदित्य ठाकरे 

Aprna

‘नमो’ टीव्हीच्या प्रसारणाविरोधात काँग्रेस-आपने केली निवडणूक आयोगाकडे तक्रार

News Desk

भिमा काेरेगाव येथे सीआरपीएफच्या बंदाेबस्तात पार पडणार मतदान

News Desk