HW News Marathi
देश / विदेश

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानची कुरघोडी कायम, भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

नवी दिल्ली | भारतीय हवाई दलाकडून मंगळवारी (२६ फेब्रुवारी) करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतरही अद्याप पाकिस्तानने यातून धडा घेतलेला नाही. नौशेरा आणि बारामुल्ला भागात पाकिस्तानी सैन्याकडून नियंत्रण रेषेवरील (एलओसी) घरांच्या मागे दडून शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या गोळीबाराला भारताकडून सैन्याकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. यात भारताचे ५ जवान जखमी झाले असून पाकिस्तानचे ५ सैनिक मारले गेले आहेत. शोपियानमध्येही आता भारतीय जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरु झाली आहे.

नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरु असलेल्या भागात सामान्य नागरिकांची वस्ती असल्याने भारतीय सैन्याकडून केवळ पाकिस्तानच्या चौक्यांवर गोळीबार केला जात आहे. यात भारतीय सैन्याला पाकिस्तानच्या ५ चौक्या उध्वस्त करण्यास यश आले आहे. पाकिस्तानी सैन्याकडून मंगळवारी संध्याकाळपासूनच नियंत्रण रेषेवर १२ ते १५ वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहेत. यावेळी पाकिस्तानकडून मिसाईलचा देखील वापर करण्यात आला. दरम्यान, शोपियानमधील मेमंदेर भागातील एका घरात ३ ते ४ दहशतवादी दडून बसल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झेलेन्स्कींनी युक्रेनमधून पलायन केल्याचा रशियन मीडियाचा दावा

Aprna

काँग्रेसला नक्की काय करायचंय आणि दिशा कोणती याबाबत संभ्रम, राऊतांचा काँग्रेसशी ‘सामना’!

News Desk

मराठा समाज आज रस्त्यावर उतरला नाही तर वेळ निघून जाईल ! चंद्रकांत पाटलांचा इशारा

News Desk