HW News Marathi
राजकारण

युतीसाठी भाजपकडून मनसेची मनधरणी ?

मुंबई | मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी सोमवारी (३१ डिसेंबर) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘कृष्णकुंज’वर जाऊन भेट घेतली आहे. या दोन्ही पक्षांच्या नेत्यांची तब्बल दोन तास गुप्त बैठक सुरु होती. दरम्यान, राज ठाकरे आणि आशीष शेलार यांच्या या गुप्त बैठकीमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे. अद्याप या बैठकीतील मुद्दे अधिकृतरीत्या स्पष्ट झालेले नसले तरी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर युतीसाठी भाजपकडून मनसेला गळ घालण्यात आल्याची चर्चा सुरु आहे.

भाजपसोबत सत्तेत असूनही बहुतांश वेळा शिवसेना विरोधी पक्षाच्या भूमिकेत दिसते. भाषणांमधून त्याचप्रमाणे ‘सामना’तून शिवसेनेकडून वारंवार भाजपवर जहरी टीका केली जाते. याच पार्श्वभूमीवर युतीसाठी भाजपकडून शिवसेनेऐवजी मनसेची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, या बैठकीबाबतची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच नेमक्या गोष्टी स्पष्ट होतील.

आगामी निवडणुकीत मनसे देणार का भाजपला टाळी ?

“भाजपने जरी टाळीसाठी मनसेकडे हात पुढे केला असला तरी मनसे भाजपला टाळी देणार का ?”, हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. आपल्या भाषणांमधून आणि व्यंगचित्रांमधून भाजप सरकारवर सडकून टीका करणारे राज ठाकरे भाजपसोबतच युती करण्यास तयार होणार का ? हे येणारा काळच ठरवेल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बिहारच्या छपरा येथील मतदान केंद्रात ईव्हीएम मशीन फोडल्याने गोंधळ

News Desk

उच्च न्यायालयाकडून शरद पवारांना दिलासा

News Desk

केंद्राच्या ‘अरे’ला ममता ‘का रे’ने प्रत्युत्तर दिले !

News Desk
राजकारण

मुख्यमंत्र्यांची विखे-पाटील यांना अवमानता नोटीस

News Desk

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या बिल्डर्सना फायदा मिळवून देण्याच्या उद्देशाने मुंबईच्या विकास आराखड्यात बदल करून तब्बल १ लाख कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला होता. विखे-पाटील यांनी केलेल्या या आरोपाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विखे-पाटील यांना अवमानता नोटीस पाठवली आहे. विखे-पाटील यांचे हे सर्व आरोप तथ्यहीन असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हटले आहे.

“मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकास आराखड्यात बदल करून १ लाख कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि बिल्डर्समध्ये १० हजार कोटी रुपयांचा सौदा झाला असून त्यापैकी ५ हजार कोटी रुपये आधीच मुख्यमंत्री कार्यालयाला पाठविण्यात आले आहेत”, असा गंभीर आरोप विखे-पाटील यांनी केला होता. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी मात्र त्यांच्यावरील हे सर्व आरोप फेटाळून लावत विखे-पाटील यांना अवमानता नोटीस पाठवली आहे.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात २ दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

द्रौपदी मुर्मी देशाच्या 15 व्या राष्ट्रपती, आज सरन्यायाधीश देणार गोपनीयतेची शपथ

Aprna

चंद्राबाबू उगाच स्वतःची दमछाक का करून घेत आहेत ?

News Desk