HW News Marathi
राजकारण

कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे खरे वैचारिक वारसदार !

मुंबई | कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा रथ पुढे नेण्याच्या कार्यासाठी आपले जीवन अर्पण केले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड हे खरे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे वैचारिक वारसदार होते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. माता रमाबाई आंबेडकर नगर येथे कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जाहीर अभिवादन सभेत आठवले बोलत होते.

गोदरेजच्या मोकळ्या जागेवर शासनाने बेघरांना घरे बांधून द्यावीत

गोदरेज ची मोकळी जागा मोठ्या प्रमाणात आहे. त्यातील जागेच्या प्रॉपर्टी कार्डवर गोदरेज चे चुकीने नाव लागले आहे. गोदरेज कंपनीची ती मोकळी जागा शासनाने ताब्यात घेऊन गरिबांसाठी बेघरांसाठी घरे बांधावीत अशी सूचना करून माता रमाबाई आंबेडकर नगर चा पुनर्विकास करण्यासाठी शासनासोबत लवकरच बैठक आयोजित करणार असल्याचे आश्वासन रामदास आठवले यांनी यावेळी दिले. शासनाने सन २०११ च्या झोपड्यांना अधिकृत मान्यता दिली असली तरी सन २०१४ च्या निवडणुकीत ज्यांनी मतदान केले त्यांच्या झोपड्या अधिकृत करण्याच्या मागणीचा पुनरुच्चार आठवलेंनी केला.

…तर डॉ बाबासाहेब आंबेडकर भारताचे प्रधानमंत्री झाले असते

डॉ बाबासाहेब आंबेडकरांना आणखी काही वर्षे आयुष्य लाभले असते तर ते भारत देशाचे प्रधानमंत्री झाले असते असे सांगत भारताची लोकशाही राज्यव्यवस्था महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञानांतून साकारलेल्या संविधानामुळेच सुरळीत निर्धोक सुरू आहे .कोणी कितीही प्रचार केला तरी भारतीय संविधानाला कुणापासूनही धोका होऊ शकत नाही. संविधान बदलणार असा विरोधकांचा प्रचार आहे खोटा निराधार असून संविधान कोणी कधीही बदलणार नाही असा विश्वास रामदास आठवलेंनी व्यक्त केला आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड ; बी सी कांबळे; आर डी भंडारे ;दादासाहेब रुपवते यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा वैचारिक वारसा चालविला. मला ही महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद लाभला आहे. माझ्या हाती आहे झेंडा निळा म्हणून अनेकांच्या पोटात उठतोय गोळा अशी चारोळी आठवलेंनी यावेळी सादर केली. यावेळी रिपाइं चे अनेक मान्यवर उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोरेगाव-भीमा प्रकरण एनआयएकडे म्हणजे काही गोष्टी लपवायच्या आहेत !

News Desk

सुशीलकुमार शिंदेंच्या डोक्यातील चिपची मेमरी फार कमी आहे !

News Desk

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit