HW News Marathi
राजकारण

सरकार जितेंद्र आव्हाड यांना मारण्याचा कट रचत आहे का ?

नाशिक | “जितेंद्र आव्हाड यांना धमक्या आलेल्या असताना देखील त्यांची सुरक्षा कमी करुन सरकार त्यांना मारण्याचा कट रचत आहे का ?,” असा संतप्त सवाल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी उपस्थित केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि छगन भुजबळ यांची सुरक्षाव्यवस्था कमी केल्याने पक्षातील नेत्यांनी गंभीर नाराजी व्यक्त केली आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.

“छगन भुजबळ हे सरकारवर टीका करतात म्हणून सरकारने त्यांची सुरक्षा कमी केली. एवढे गलिच्छ राजकारण करू नये”, असेही धनंजय मुंडे यांनी यावेळी म्हटले आहे. आगामी निवडणुका काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या असताना या दोघांची सुरक्षा कमी करणे हे धक्कादायक आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले. त्याचप्रमाणे याबाबत आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे धनंजय मुंडेंनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई युथ कॉंग्रेसने केले मोदींना लक्ष

News Desk

कोणाची कॅालर तर कोणाच्या मिशा, हीच आहे का सातारच्या प्रचाराची दिशा ?

News Desk

उदय सामंत नॉट रिचेबल; शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीच्या दिशेने रवाना

Aprna