HW News Marathi
राजकारण

लाट वगैरे काही नाही आता त्यांची वाट लागली आहे !

मुंबई | “लाट वगैरे काही राहिलेले नाही आता त्यांची वाट लागलेली आहे”, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. “हा देश व राज्य भाजप सरकारच्या कचाटयातून सोडवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेत, राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना वंदन करुन राष्ट्रवादीने ही निर्धार परिवर्तन संपर्क यात्रा सुरु केली आहे”, असे जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले आहे.

“भाजप सरकारच्या चार वर्षाच्या काळात काय विकास झाला ? जनतेच्या हाती काय लागले तर काही नाही.आमच्या काळात जी प्रगती करण्यात आली ती सगळी अधोगतीकडे नेली”, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. यावेळी जयंत पाटील यांनी शिवसेनेवरही टीका केली आहे. “एकीकडे भाजपच्या विरोधात बोलायचे आणि दुसरीकडे मुख्यमंत्र्यांची एका हॉटेलमध्ये भेट घ्यायची असा प्रकार सुरु आहे. उध्दव ठाकरे यांचे बाळासाहेबांचे रक्त असेल तर सरकारमधून बाहेर पडण्याची हिंमत दाखवावी”, असे विधानही जयंत पाटील यांनी केले आहे.

“भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व समविचारी पक्षसोबत आल्याशिवाय राहणार नाहीत. हे सत्य आहे. त्यादृष्टीने तयारी सुरु असून भाजप सरकारचा शेवट केल्याशिवाय ही परिवर्तन यात्रा संपवणार नाही” असेही जयंत पाटील यांनी यावेळी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चिता पेटत होती अन् सत्तातूर भुते सत्तेसाठी एकमेकांच्या मानगुटीवर बसत होती !

News Desk

उपकार प्राप्त इमारतींना आकारण्यात येणारा वाढीव सेवाशुल्क कर रद्द; उपमुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

Aprna

“…किती अफजल खान आले तरी मला त्याची पर्वा नाही”, उद्धव ठाकरेंचा शिंदे गटाला इशारा

Aprna