HW News Marathi
राजकारण

भाजपचे सर्व प्रयत्न व्यर्थ, आता तरी आत्मचिंतन करा !

मुंबई | महाराष्ट्रानंतर आता भाजपच्या हातून आणखी एक राज्य निसटण्याची चिन्हे दिसत आहेत. झारखंड विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास स्पष्ट होत आले आहेत आणि त्यानुसार भाजप सातत्याने पिछाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेने भाजपला टोला लागवण्याची संधी साधली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपला आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला आहे. “झारखंड विधानसभा निकालांनंतर आता तरी भाजपने आत्मचिंतन करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी आपली पूर्ण ताकद पणाला लावली मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही”, असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला आहे.

“नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या मुद्द्यामार्फत पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी झारखंडमध्ये आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली. मात्र, त्याचा काहीही फायदा झाला नाही. त्यांचे हे प्रयत्न व्यर्थ गेले”, असा खोचक टोला यावेळी संजय राऊत यांनी लगावला आहे. ज्याप्रमाणे यंदाच्या विधानसभेनंतर महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरून देखील निवडणुकीनंतर शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाविकासाआघाडीमुळे भाजपला सत्तेपासून दूर राहावे लागले. त्याचप्रमाणे, झारखंडमध्येही झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल यांच्या निवडणूक पूर्व आघाडीमुळे भाजपसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे, हे राज्य देखील आता भाजपच्या हातून जवळपासून निसटल्यातच जमा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दूध भेसळीच्या मुद्यावर अजित पवार विधानसभेत आक्रमक

Aprna

काँग्रेसकडून जनतेला अपेक्षा नाहीतच, परंतु शरदराव तुम्हीसुद्धा ?

News Desk

बुरखा घालणारी प्रत्येक महिला दहशतवादी नसते !

News Desk