HW News Marathi
Karnataka Election 2018 देश / विदेश

कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसच्या सत्तेचा मार्ग मोकळा

बंगळुरु | येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेस आणि जेडीएस यांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. काँग्रेस-जेडीएस हे राज्यपाल वजुभाई वाला यांच्याकडे सत्ता स्थापनेचा दावा करतील. त्यानंतर राज्यपाल काँग्रेस-जेडीएसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण देतील.

राज्यपाल काँग्रेस-जेडीएसला सत्ता स्थापनेसाठी किती वेळ देतील. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अखेर कर्नाटकात काँग्रेस-जेडीएसची सत्ता येणार. कर्नाटकात बहुमतासाठी ११२चा आकडा असने गरजे आहे. तर काँग्रेस ७८ आणि जेडीएस ३८ यांच्या एकूण ११६ अशा आमदारचे संख्या बळ आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसला सत्ता स्थापन करण्यासाठी फार कसरत करावी लागणार नाही.

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध न करता आल्यामुळे बी. एस. येडियुरप्पा यांनी राजनामा दिला. येडियुरप्पा यांच्या राजनाम्याने भाजपच्या हातात आलेले मुख्यमंत्री पद गमवावे लागले. कर्नाटकात भाजप हा मोठा पक्ष म्हणून निवड आला असली तरी बहूनताचा आकडा पार करता न आल्यामुळे त्यांना विरोधी पक्षाच्या खुर्चीत बसावे लागणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संरक्षण मंत्री निर्मला सीताराम यांनी विंग कमांडर अभिनंदन यांची घेतली भेट

News Desk

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण l आरोप निश्चितीला स्थगिती नाही – उच्च न्यायालय

News Desk

फ्रान्सहून रवाना झालेले राफेल अवघ्या काही तासात भारतात होणारं दाखले !

News Desk
महाराष्ट्र

पाण्यात बुडून बहिण भावाचा मृत्यू

News Desk

बीड | बहिण पाण्यात बुडत असताना वाचवायला गेलेल्या भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना बीड तालुक्यातील रामनगर शिवारातील पाझर तलाव येथे शनिवारी सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यामुळे परीसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सुरज राजेश पवार (वय १५) व रंजना राजेश पवार (वय ८) रा. सात्रापोत्रा ता.बीड अशी मृत बहिण – भावाची नावे आहेत. रामनगर शिवारात या दोघांचे आई-वडील विहीरीवर कामास येत होते. त्यांच्याबरोबरच शनिवारी सुरज व रंजना आले असता नेहमीसारखे ते पोहण्यासाठी लगतच्या पाझर तलावाकडे गेले. सुरज याला पोहता येत होते तो बहीणीलाही पोहायला शिकवत होता. मात्र, तलावाच्या खड्ड्यातील पाण्याचा अंदाज न आल्याने रंजना ही बूडू लागली . तिने वाचविण्यासाठी आरडाओरड करताच सुरज तिला वाचविण्यासाठी गेला असता तिने त्याला घट्ट मिटी मारली त्यामुळे या दोघांचाही यावेळी बुडून मृत्यू झाला.

राजेश पवार यांना सुरज आणि रंजना ही दोनच मुले होती. मात्र, शनिवारच्या या दुर्घटनेत त्यांनी दोघांनाही एकाच वेळी गमावल्याने त्यांच्या भावनांचा बांध फुटला होता. दोघांचेही मृतदेह एकाच वाहनातून जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. हे दोघेही घटनास्थळीच मृत होऊन देखील आणखी एकदा तपासणी करण्याची विनवणी हे माता-पिता करीत होते. १५ वर्षाचा सुरज हा त्यांना विहीर खोदण्याच्या कामातही मदत करीत होता.

Related posts

केवळ शेतकऱ्यांचे आंदोलन चाललंच पाहिजे, या हेतूने काही लोकं ते चालवण्याचा प्रयत्न करत – देवेंद्र फडणवीस 

News Desk

“तुम्ही मोठे व्हा काँग्रेसलाही मोठे करा”, बाळासाहेब थोरातांनी धवलसिंहाना साद 

News Desk

केवळ लक्ष्मीपुजनाच्या दिवशी फटाके वाजवण्यास पालिकेची परवानगी

News Desk