HW News Marathi
राजकारण

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

मुंबई | महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी झटणारा ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दुःखद निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पार्थिवाचे सोमय्या रुग्णालय येथे जाऊन आठवले यांनी अंत्यदर्शन घेतले. शहरी भागासोबतच विदर्भातील ग्रामीण प्रश्नांची पांडुरंग फुंडकर यांना चांगली जाण होती. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचे रिपब्लिकन पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. लोकसभा सदस्य असताना त्यांच्याशी माझे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk

मी तुम्हाला ‘चौकीदार’ची टोपी आणि शिटी देतो !

News Desk

काँग्रेसला आज नवा अध्यक्ष मिळणार; मतमोजणीला सुरुवात

Darrell Miranda
राजकारण

पालघरमध्ये भाजप विजयी

News Desk

पालघर | देशाचे लक्ष लागलेल्या पालघर लोकसभा पोटनिवडणुकीचा गुरुवारी निकाल लागला. कॉंग्रेस मधून भाजपात आलेले राजेंद्र गावित हे या निवडणूकीत भाजपाचे उमेदवार होते तर दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांचे चिरंजीव श्रीनिवास वनगा यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. त्यामुळे या चुरशीच्या लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते.गुरुवारी लागलेल्या निकालानुसार राजेंद्र गावित यांना जवळपास २ लाख ७२ हजार ७८२ मते मिळवली तर दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेनेच्या श्रीनिवास वनगा यांना सुमारे २ लाख ४३ हजार २१० मते मिळाली आहेत.

उमेदवारी अर्ज भरण्याच्या काही तासच आधी भाजपात आलेले तरीही लोकप्रिय म्हणून मतदानातून सिद्ध झालेले राजेंद्र गावित पालघर मध्ये जास्तीत जास्त मतांनी विजयी झाल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरले आहेत. भाजपचे खासदार चिंतामन वनगा यांच्या निधनामुळे इथे पोटनिवडणूक घेण्यात आली होती. परंतु त्यांच्याच मुलाला शिवसेनेने उमेदवारी देऊनही जनतेने वनगांच्या बाजूने कौल न दिल्यामुळे ते ही तितकेच चर्चेचा विषय ठरले आहेत.

पालघरमध्ये गावित यांच्या विजयामुळे शिवसेनेला चांगलाच धक्का लागल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. विजयानंतर या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. परंतु, आजच भाजपचे वरिष्ठ नेते पांडुरंग फुंडकर यांचे निधनाझाल्यामुळे जल्लोष साजरा न करण्याचा आदेश पक्षाच्या वतिने देण्यात आले आहेत. गावित विजयी झाले असले तरी निवडणूक आयोगाकडून याबाबत औपचारिक घोषणा करणे बाकी आहे.

 

Related posts

 नथुराम गोडसे स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी | कमल हसन

News Desk

नरक चतुर्दशीच्या मुहूर्तावर राज ठाकरेंनी घेतला भाजप सरकारचा समाचार

Gauri Tilekar

प्रकाश आंबेडकरांचा महत्वपूर्ण निर्णय

News Desk