HW News Marathi
राजकारण

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

मुंबई | महाराष्ट्राचे कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे कृषी आणि सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण विकासासाठी झटणारा ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला. अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिवंगत पांडुरंग फुंडकर यांना आदरांजली वाहिली आहे.

कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या दुःखद निधनाचे वृत्त कळताच त्यांच्या पार्थिवाचे सोमय्या रुग्णालय येथे जाऊन आठवले यांनी अंत्यदर्शन घेतले. शहरी भागासोबतच विदर्भातील ग्रामीण प्रश्नांची पांडुरंग फुंडकर यांना चांगली जाण होती. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांची श्रद्धा होती. त्यांचे रिपब्लिकन पक्षाशी मैत्रीपूर्ण संबंध होते. लोकसभा सदस्य असताना त्यांच्याशी माझे निकटचे संबंध होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्राची हानी झाली असल्याची शोकभावना रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजप-शिवसेनेचं जमलंच ! हिंदुत्त्वासह लोकांच्या भावनेचा मुद्दा पुढे करून पुन्हा युती

News Desk

५० वर्षे सत्ता टिकविण्याचा संकल्प करा |अमित शहा

News Desk

पेट्रोल पंपांवर मोदींचा फोटो, दरवाढीचा फलकही लावा! – उद्धव ठाकरे

News Desk