HW News Marathi
राजकारण

आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही !

मुंबई | “आपण एकत्र राहिलो तर भाजपचा पराभव झाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही जनमताच्या आधारावर निवडणूक जिंकण्याची तयारी ठेवा”, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ईशान्य मुंबई विभागाचा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

“या सरकारच्या काळात लोकशाही मोडीत काढली जात आहे. सध्या देशात लोकशाही राहणार की जाणार अशी शंका निर्माण झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीनंतर सार्वत्रिक निवडणुका होणार कि नाही याबाबत लोकांच्या मनात शंका आहे”, असेही दिलीप वळसे पाटील म्हणाले. त्याचप्रमाणे “आज देशात २०१४ सारखी परिस्थिती राहिली नाही. शरद पवार सर्वपक्षीय नेत्यांना एकत्र आणत आहेत. त्यामुळे आपण या जातीयवादी ताकदीचा पराभव करू शकतो. पण त्यासाठी आपल्याला एकजुटीने काम करावे लागेल”, असेही दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रचारसभा या भजन करण्यासाठी नसतात !

News Desk

अन् शरद पवार म्हणतात, अभी तो मै जवान हूं !

News Desk

पाच राज्यांत जनतेनेच ‘भाजपमुक्त’चा संदेश दिला !

News Desk