HW News Marathi
राजकारण

राम कदम दोषी आढळल्यास कारवाई करू | विनोद तावडे

मुंबई | “उद्या मला सांगितलेत की एखाद्या मुलीला प्रपोज केले आहे ती नाही म्हणते. तुमच्या आई वडिलांना समोर आणा ते जर म्हटले की मुलगी पसंत आहे तर तिला पळवून आणेन” असे चुकीचे वक्तव्य राम कदम यांनी मुलीसंदर्भात केलेले आहे. यावर मी सांस्कृतिक आणि शिक्षणमंत्री आहे. कारवाई करण्याचे माझ्या हातात नाही. जर राम कदम दोषी आढळल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल. असे वक्तव्य विनोद तावडे यांनी केले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही महिलांनी आज बुधवारी विनोद तावडे यांना राम कदम यांनी दहीहंडीच्या कार्यक्रमात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा घेराव घालून जाब विचारला. त्यांना उत्तर देताना तावडे म्हणाले की, ‘प्रसार माध्यमांवर जी राम कदम यांची क्लिप दाखवली जाते, तसे वकव्य करणे चुकीचेच आहे. जर यामध्ये ते दोषी आढल्यास गृह खाते त्यांच्यावर योग्य ती कारवाई करेल.’

भाजपचे आमदार राम कदम यांनी दहिहंडीच्या उत्सवात महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आज राम कदम यांच्या घरावर धडक मोर्चा काढला. यावेळी मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, मुंबई युवती अध्यक्षा, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसकडून राम कदम यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.’आम्ही जिजाऊच्या लेकी, पळवुन दाखवा, राम कदमांचा चौरंग करु’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मान्सूनची लहर आणि हवामान खात्याचा कहर

News Desk

“बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय…,” ED च्या कारवाईवर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Aprna

आता १२ वी पर्यंतचे शिक्षण मोफत होण्याबाबत मोदी सरकारकडून नवी घोषणा ?

News Desk
मुंबई

धारावीतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून डी आर पी योजनेत समाविष्ट करा | चंद्रकांत पाटील

News Desk

मुंबई | धारावी पुनवर्सन मध्ये डी आर पी योजनेतून धारावी कोळीवाडा वगळण्यात आला होता. त्यासंदर्भात मुंबई भाजपा सचिव दिव्या डोले यांना कोळीवड्यातील नागरिकांनी निवेदन देऊन न्याय मागितला होता. त्यामुळे डोले यांनी त्वरित राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना निवेदन आणि भेट घडवून आणली आज कोळीवड्यातील नागरिकांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.

यावेळी पाटील यांनी संबंधित अधिकारी वर्गाला सूचना देऊन हा डी आर पी योजनेचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा व त्या कोळीवड्यातील मोजमाप करण्याची वेळ, तारीख निश्चित करावी मे स्वतः तेथे उपस्थित राहून त्या जागेचे मोजमाप करून धरावी पुनवर्सन मध्ये समाविष्ट करण्याच्या सूचना देत आहे. पुढील आठवड्यातच हा प्रश्न मार्गी लागणे महत्वाचे आहे. असे शेवटी महसूलमंत्री पाटील यांनी अधिकारी वर्गाला सांगून धारावीतील रहीवाश्यांना दिलासा दिला आहे.

Related posts

जिल्हा बँकांतील जुन्या नोटा स्विकारणार आरबीआय

News Desk

एबीव्हीपी आणि एसएफआयच्या कार्यक्रमांमध्ये मारामारी

News Desk

प्रजा फाउंडेशन तर्फे आमदारांचे वार्षिक कार्य अहवाल प्रकाशित

swarit