HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : खोतकरांची माघार, जालन्यातून दानवेंनाच मिळणार उमेदवारी ?

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जालना लोकसभा मतदारसंघावरून भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यामध्ये निर्माण झालेला वाद सोडविण्यात यश आल्याची माहिती माहिती सूत्रांकडून मिळत आहे. अखेर अर्जुन खोतकर यांनी माघार घेतली असून रावसाहेब दानवे यांना जालन्यातून लोकसभेची उमेदवारी मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.

जालन्यातील लोकसभेच्या जागेबाबत रावसाहेब दानवे आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी ४ मार्चला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांची भेट घेतली होती. या चर्चेनंतर आमच्यात सर्व काही अलबेल असल्याचा दावा रावसाहेब दानवेंकडून केला गेला होता. मात्र, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेतील”, असे खोतकर यांनी म्हटले होते.

दरम्यान, खोतकर यांनी रावसाहेब दानवेंच्या विरोधात निवडणूक लढविण्याची भूमिका देखील घेतली होती. दानवे-खोतकरांच्या भेटीनंतरही खोतकर आपल्या निर्णयावर ठाम होते. इतकेच नव्हे तर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही खोतकर आपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, अखेर उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांमध्ये झालेल्या चर्चेनंतर अखेर खोतकरांनी माघार घेतल्याची माहिती मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कर्नाटकात मराठी तरुणांवर अमानुषपणे लाठीचार्ज

Gauri Tilekar

मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघाताला पायलट जबाबदार

News Desk

बीड पोलिसांकडून चंदन तस्करांविरोधात मोठी कारवाई; 10 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Aprna