HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : …तर मग मोदींनी सर्वच ४२ मतदारसंघातून निवडणूक लढवावी !

नवी दिल्ली | “नरेंद्र मोदींनी हिंमत असेल तर २०१९ ची निवडणूक पश्चिम बंगालमधून लढवावी”, असे खुले आव्हान तृणमुल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले आहे. “जनसामान्यांच्या न्यायालयात पंतप्रधान मोदींना दंड भोगावा लागेल. जर मोदींना एका मतदारसंघाची भीती वाटत असेल तर मग त्यांनी सर्वच ४२ जागांवरुन निवडणूक लढवावी”, असाही खोचक टोला यावेळी ममता बॅनर्जी यांनी लगावला आहे.

“कोणत्याही उमेदवाराला कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा अधिकार लोकशाहीनेच दिला आहे. मी देखील वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकते. पश्चिम बंगालचा मतदार संघ हा अत्यंत संवेदनशील मतदार संघ आहे. त्यामुळे मोदींनी या मतदारसंघातून निवडणूक लढवावी. परंतु जर पंतप्रधान मोदी पश्चिम बंगालमधून लढले तर त्यांची अवस्था मात्र नोटबंदीसारखी होईल”, असे ममता बॅनर्जी यांनी यावेळी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील ठाकरे गटाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने ‘या’मुळे नकारली

Aprna

तेलंगणात निकालापूर्वीच सत्ता स्थापनेची तयारी

News Desk

शरद पवार यांचा पुन्हा यूटर्न !

News Desk