HW News Marathi
राजकारण

#LokSabhaElections2019 : नीरव मोदीला अटक झाली यात तुमचे कसले यश ?

नवी दिल्ली | “नीरव मोदीला अटक झाली यात तुमचे कसले यश ? तो परदेशात पळून कोणामुळे गेला ?”, असा सवाल काँग्रेसच्या पूर्व उत्तर प्रदेशच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारला उद्देशून केला आहे. पंजाब नॅशनल बँकेचे तब्बल १३,००० कोटी रुपये थकवून परदेशात पसार झालेला हिरेव्यापारी नीरव मोदीला बुधवारी (२० मार्च) लंडनमध्ये अटक करण्यात आली. दरम्यान, नीरव मोदीला झालेली ही अटक म्हणजे पंतप्रधान मोदींचे मोठे यश असल्याचा दावा भाजपकडून केला जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रियांका गांधी यांनी हा सवाल केला आहे.

नीरव मोदीला अटक होणे यात तुमचे कसले यश ?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी केला आहे. प्रियांका गांधी या सध्या उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्या बोलत होत्या. देशातील आगामी लोकसभा निवडणुका अगदी काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे नेमक्या लोकसभा निवडणुकांच्या काळातच ही कारवाई का करण्यात येत आहे ? असा देखील सवाल काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी उपस्थित केला आहे.

पंजाब नॅशनल बँकेला १३,००० कोटींचा चुना लावून पसार झालेल्या नीरव मोदीला भारताच्या हवाली करावे, अशी मागणी मोदी सरकारकडून ब्रिटनकडे करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर “मोदी सरकारनेच नीरवला भारतातून पळून जाण्यासाठी मदत केली. आता तेच त्याला पुन्हा भारतात परत आणण्याच्या प्रयत्नात आहेत. हे सर्व काही फक्त निवडणुकांसाठी सुरु आहे. निवडणूक झाल्यानंतर त्याला पुन्हा परत पाठवण्यात येईल”, असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईवर दावा सांगणे खपवून घेणार नाही! – देवेंद्र फडणवीस

Aprna

शिवसेनेला बाजूला ठेवून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही! – उद्धव ठाकरे

Aprna

निजामाची चाटुगिरी थांबवली नाही,तर तुमचाही ‘औरंग्या’ झाल्याशिवाय राहणार नाही !

News Desk