HW News Marathi
राजकारण

मध्य प्रदेशात संध्याकाळी ६ वाजेपर्यंत ७४ टक्के मतदान

नवी दिल्ली | मध्य प्रदेश आणि मिझोरम या दोन राज्यांमध्ये आज (२८ नोव्हेंबर) विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु आहे. संध्याकाळी ६ वाजता ७४.६१ % मतदानाची नोंद झाली असून मतदान अद्याप सुरु आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही राज्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेसमध्ये यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

दरम्यान, आज मध्य प्रदेश व मिझोराम या राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी मतदान सुरु असताना काँग्रेस नेत्यांकडून राज्यात जवळपास ७० हूनही अधिक ठिकाणच्या ईव्हीएम मशिन्समध्ये बिघाड झाल्याची शंका उपस्थित केली होती. राज्यात ७० पेक्षाही जास्त ठिकाणच्या ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाला असल्याची तक्रार करण्यात आली असून या मशीन्स तात्काळ बदलण्यात आल्याचे राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी याबाबत ट्विटरवरुन माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही !

swarit

भटिंडामधील मतदान केंद्रावर गोळीबार

News Desk

पंढरपूरच्या सभेतून शिवसेना फुंकणार निवडणुकीचे रणशिंग

News Desk
राजकारण

कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता

News Desk

कर्नाटक | कर्नाटक विधानसभा निवडणूकीत भाजपला झटका बसण्याची शक्यता एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. इंडिया टुडे आणि कार्वी इनसाईटस यांनी केलेल्या एकत्र संशोधनातून कर्नाटकात आज निवडणुका झाल्यास काँग्रेला २२५ पैकी १०१ पर्यंत जागा मिळण्याची शक्यता ओपिनिअन पोलद्वारे वर्तवण्यात आली आहे. तर भाजपच्या जागांमध्ये देखील वाढ होणार असून ७८ ते ८६ पर्यंत पोहोचतील असेही या पोलमधून दर्शविण्यात आले आहे.

कर्नाटकात विधानसभेची निवडणूक येत्या १२ मे रोजी होणार आहे. राज्यात कॉंग्रेसचे सरकारअसून ओपिनिअन पोलनुसार जनता पुन्हा कॉंग्रेसलाच संधी देणार असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. सध्या कॉंग्रेसकडे २२५ जागांपैकी त्यांच्याकडे १२२ जागा आहेत. सध्या भाजपकडे ४३, जनता दल सेक्युलरकडे २९, इतर पक्षांचे १४ आमदार असून १६ जागा रिक्त आहेत.

 

Related posts

हवे तर कोठडीत घाला, पण अडचणीचे प्रश्न विचारतच राहणार!: सचिन सावंत

swarit

औसामध्ये युतीच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान मोदी-उद्धव ठाकरे प्रथमच एका मंचावर

News Desk

उध्दव ठाकरेंना अयोध्येत होतोय विरोध 

News Desk