HW News Marathi
राजकारण

भाजपने डावलल्याने जानकर नाराज, रासपच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक

मुंबई | राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना डावलून भाजपकडून बारामती लोकसभा मतदारसंघातून रासपचे आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे अस्वस्थ असलेले महादेव जानकर यांनी शनिवारी (२३ मार्च) पुण्यात रासपच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. या बैठकीत नेमकी काय चर्चा होणार ? काय निर्णय घेतला घेतला जाणार ? याकडे सध्या सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

रासपचे आमदार राहुल कुल हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अधिक संपर्कात असल्याची माहिती मिळत आहे. याचमुळे राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी मिळाल्याची चर्चा आहे. मात्र, भाजपने यावेळी राजकीय डाव खेळ एकीकडे रासपच्याच आमदाराच्या पत्नीला उमेदवारी दिली तर दुसरीकडे रासप अध्यक्ष जानकर यांना उमेदवारी नाकारली आहे. याचमुळे जानकर नाराज असल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुक बारामती मतदारसंघातून लढविण्यास महादेव जानकर पहिल्यापासूनच आग्रही होते. मात्र, या मतदारसंघातून लढायचे असेल तर भाजपच्या चिन्हावर लढावे लागेल अशी अट भाजपकडून घालण्यात आली होती. मात्र, जानकर यांनी आपल्या स्वतंत्र पक्षाच्या म्हणजेच रासपच्या चिन्हावरच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणूनच, भाजपकडून जानकर यांना बारामतीतून उमेदवारी नाकारल्याची चर्चा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप-शिवसेनेची युती झाली तर स्वाभिमान पक्ष संपूर्ण महाराष्ट्रात स्वतंत्र लढेल !

News Desk

आम्हाला त्यावेळी काँग्रेसने प्रतिसाद दिला नाही, आता आम्ही मागे हटणार नाही !

News Desk

राज्यात ७२३१ पोलीस शिपाई भरती प्रक्रिया; पोलीस भरतीसाठी सुरुवातीला शारीरिक चाचणी होणार; गृहविभागाची अधिसूचना जारी

Aprna
देश / विदेश

पंतप्रधान मोदींकडून पाकिस्तानला ‘राष्ट्रीय पाकिस्तान दिना’च्या शुभेच्छा

News Desk

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. या पार्श्वभूमीवर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला ‘राष्ट्रीय पाकिस्तान दिना’च्या शुभेच्छा दिल्याचा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. इम्रान खान यांनी याबाबतचे ट्विट केले आहे. दरम्यान, भाजपकडून ही केवळ एक औपचारिकता असल्याचे म्हटले जात आहे.

भारताच्या पंतप्रधानांनी अन्य देशांच्या राष्ट्रीय दिनानिमित्त किंवा राष्ट्रीय सणानिमित्त शुभेच्छा देणे हा केवळ एक औपचारिकतेचा भाग असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, पुलवामा हल्ल्यानंतर भारताकडून पाकिस्तानच्या नॅशनल डेनिमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या सर्व कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. दरम्यान, असे असूनही पंतप्रधान मोदी यांनी पाकिस्तानला ‘राष्ट्रीय पाकिस्तान दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करा, मायावतींची मागणी

News Desk

ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांना अपोलो रुग्णालयात हलविले, मल्लिका दुआ यांची माहिती

News Desk

राष्ट्रगीताचा अनादर केल्याप्रकरणी ममता बॅनर्जी यांना मुंबई न्यायालयाचे समन्स

News Desk