HW News Marathi
राजकारण

महाराष्ट्रातील नेत्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांची पुस्तके द्यायला हवीत !

मुंबई | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वीर सावकरांविषयीच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे राज्यासह देशातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. विविध स्तरांतून राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर राज्यात काँग्रेससोबत सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील काँग्रेसवर टीका केली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून राहुल गांधींसह काँग्रेसवर टीका केली आहे. त्याचप्रमाणे, प्रसारमाध्यमांशी बोलताना देखील त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांची पुस्तके भेट दिली पाहिजेत”, असा टोला देखील संजय राऊत यांनी लगावला आहे. त्याचप्रमाणे, संजय राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते अटलबिहारी वाजपेयी यांनी वीर सावकरांविषयी लिहिलेल्या ओळी देखील पोस्ट केल्या आहेत.

“वीर सावरकरांचे नाव काढले तर आजही या देशातील तरुण पिढी रोमांचित होते. वीर सावरकर आजही या देशाचे हिरो आहेत आणि राहतील. आम्ही या देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील प्रत्येकाचे योगदान मानतो. भाजप मानत नसेल पण आम्ही मानतो. तुम्हीही मानायला हवे. त्यांनी केलेल्या क्रांतिकार्याचा अपमान कोणालाही करता येणार नाही. राहुल गांधींनी जे वक्तव्य केले ते दुर्दैवी. मी महाराष्ट्रातील नेत्यांना सांगेन कि त्यांनी दिल्लीत जाऊन राहुल गांधींना भेटले पाहिजे आणि वीर सावरकरांचे साहित्य त्यांना भेट म्हणून दिले पाहिजे. त्यांच्या मनातला जो गैरसमज आहे तो दूर केला पाहिजे. तर या देशात सावरकरांच्या नावाने एक नवा संघर्ष, लढण्याची प्रेरणा अनेकांना मिळेल, अशी माझी खात्री आहे”, असे संजय राऊत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राहुल कलाटे चिंचवड पोटनिवडणूक लढवणार; ‘मविआ’च्या प्रयत्नांना अपयश

Aprna

#MarathaReservation : ट्विटरवर मराठा आरक्षण ट्रेंडिंग

News Desk

रक्ताचा माणूस आपला राहू नये इतक्या खालच्या पातळीचे राजकारण होते !

News Desk