HW News Marathi
राजकारण

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाकडे लाखोंची बेहिशोबी मालमत्ता – नगरसेवकांविरोधात गुन्हा दाखल

मनसेतून शिवसेनेत गेलेल्या सहा नगरसेवकांकडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसेतून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांनी मोठयाप्रमाणात पैसे घेतल्याचा आरोप मनसेने केला होता.

एसीबीकडे मनसे नगर सेवक विरोधात तक्रार आल्यानंतर एसीबीने चौकशी सुरू केली आहे. चौकशी दरम्यान परमेश्व कदम यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता आढळून आले आहे. 13 लाख 9 हजार 419 एवढी मालमत्ता आढळून आल्याने एसीबीने गुन्हा दाखल केली आहे

महापालिका निवडणुकीत मनसेतून निवडणूक लढवून विजयी झालेल्या मनसे नगरसेवक परमेश्वर कदम, दिलीप लांडे, अर्चना भालेराव, अश्विनी माटेकर, हर्षला मोरे, दत्ता नरवणकर या सहा जणांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यांनी पैसे घेऊन शिवसेनेत प्रवेश केल्याचा मनसेने आरोप केला होता.यांची सखोल चौकशी व्हावी यासाठी मनसेच्या वतीने नगरसेवक संजय तुर्डे यांनी गेल्या वर्षी एसीबीकडे तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून एसीबीने चौकशीला सुरुवात केली आहे. यापूर्वी भाजपा खासदारनेही याबाबत तक्रार दिली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

लोकसभा निवडणूक मोदी-शहा विरुद्ध देश अशी आहे !

News Desk

मराठा आरक्षण विधेयकावर विरोधक नाराज

News Desk

“पाकिस्तानात जाऊन जावेद अख्तर यांच्याप्रमाणे चढाई करण्याची हिंमत दाखवावी”, सामनातून संघ आणि भाजपवर निशाणा

Aprna
राजकारण

सरकारला शेतकऱ्यांचे सोयरसुतकच नाही

News Desk

राज्य सरकारमध्ये सर्व काही अलेबल सुरू असल्याचे वरकरणी दिसत असले तरी सर्वसामन्य जनतेला आजही हे सरकार आपले वाटत नाही किंबहूना सरकारविषयी आपुलकी वाटत नाही. राज्य सरकार शेतकरी, सर्वसामान्यांचे कैवारी असल्याचे सांगत आहे. हे सांगण्यासाठी जाहिरातींचा भडीमार केला जात आहे. परंतु प्रत्यक्षात शेतकरी मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर पोहोचून जीवनयात्रा संपवण्यापर्यंत मजल मारतो तरी या सरकारला जाग येत नाही.

आजही सरकारला शेतकऱ्यांच्या खऱ्या समस्या समजलेल्या दिसत नाहीत. धर्मा पाटील यांच्या मृत्यूने तर सरकारच्या कारभाराचे वाभाडे राज्यसमोर आले आहेत. धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर शेतकऱ्यांच्या समस्यावर सरकार गंभीर वागेल असे दिसत असले तरी प्रत्यक्षात वेगळेच चित्र आहे. मंत्रालयाबाहेर अनेकजण आजही धर्मा पाटील यांच्या रुपात फिरत आहेत. पाटील यांनी विष प्राशन केल्याने त्यांची समस्या जगासमोर आली एवढेच..

गेल्या महिन्यातील एक उदाहरण. जळगाव जिल्ह्यातील एक शेतकरी बोंड अळीमुळे झालेले नुकसान मिळावे, यासाठी कृषी मंत्र्याच्या दालनात खेटा मारत होता. मंत्री महोदयाने स्वाक्षरी केल्यानंतरही संबंधित शेतकऱ्यास मोबदला मिळालाच नाही. निगरगट्ट अधिकाऱ्यांनी चिरीमिरीसाठी त्या शेतकऱ्याची अद्याप फाइल मंजूर केलेली नाही. धर्मा पाटील यांच्या आत्महत्येमुळे हे उदाहरण डोळ्यासमोर आले. हे दोन्ही शेतकरी खान्देशातील आहेत. त्यांच्या समस्या शेतीविषयक आहे. आणि हे सरकार सर्वसामन्यांचे असल्याचे सांगत आहे. हा सर्व विरोधाभास राज्याला अधोगतीकडे घेऊन जाण्यासाठी पुरेसा ठरू शकतो.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…नांदेड मतदारसंघाबाबत

News Desk

संकट आलं म्हणजे नाउमेद व्हायचं नसतं ! 

News Desk

आता पुढची २० वर्षे मीच खासदार राहणार !

News Desk