HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : मराठा आरक्षणावरून श्रेयवादाची लढाई ?

मुंबई। मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात पास झाल्यावर भाजपकडून जल्लोष साजरा केला जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच हे यश आल्याचं सांगत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक होत असताना शिवसेनेनं आपल्यामुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचं ट्टविट केलं आहे.

मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे सातत्याने मागण्या केल्यामुळे हे यश मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुखकर झाल्याचे शिवेसनेनं म्हटलं आहे. यातून मराठा आरक्षण मिळाल्यानंतर सुद्धा शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे.

दरम्यान, बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आले आहे. यावेळी दोन्ही सभागृहात एकमताने मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी मिळाली. त्यानंतर, सभागृहात सर्वपक्षीय आमदारांचा एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेली मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी आज पूर्णत्वास आली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बंजारा समाजाचे महंत सुनील महाराज यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत केला प्रवेश

Aprna

वर्षभरापूर्वी काश्मीरमध्ये सरकार चालवत होतात ते कोणत्या देशात ?

News Desk

दीदी तुम्ही जर काही केलेच नाही, तर मग घाबरता कशाला?

News Desk