HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : काँग्रेस-राष्ट्रवादीने आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला !

मुंबई | काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा चुकीच्या पध्दतीने हातळला. या पक्षांनी या मुद्द्यावर समाजाची दिशाभूल करत आम्हीच कसे समाजाचे कैवारी आहोत असा दिखावा केल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली आहे. ते आज (२८ जानेवारी) भाजपच्या राज्यस्तरीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी सर्वजण एकत्र आले आहेत. मात्र त्यांना घाबरण्याचे काहीही कारण नसल्याचे म्हणत रावसाहेब दानवे यांनी विरोधकांच्या महाआघाडीवर निशाणा साधला आहे. केंद्र आणि राज्याकडून अनेक कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. आता या योजना लोकांपर्यत पोहोचवा आणि आगामी निवडणुकांना सामोरे जा, असेही दानवे यांनी यावेळी म्हटले आहे.

“आघाडी सरकारने लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर नारायण राणे समितीची स्थापना केली होती. मात्र राज्य मागासवर्ग आयोगाने मराठा समाज हा शैक्षणिक, आर्थिकदृष्टया मागास असल्याचा अहवाल न दिल्याने ते आरक्षण टिकले नाही. परंतु आमच्या सरकारने या आयोगाच्या अहवालासह विधीमंडळात आरक्षणाचा ठराव मंजूर केला.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यापुढेही मी जनतेसाठी कार्यरत राहणार !

News Desk

ईशान्य मुंबईसाठी सोमय्यांऐवजी मनोज कोटक यांच्या नावाची चर्चा

News Desk

पत्राचाळ प्रकरणात नवीन ट्विस्ट; ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात तत्कालीन कृषीमंत्री आणि मुख्यमंत्र्यांचा उल्लेख

Aprna