HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : मराठा आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल

मुंबई | सरकारने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे, असे सांगत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेद्वारे सदावर्ते यांनी मराठा समाजाचे आरक्षण रद्द करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, आजच मराठा समाजाच्या आरक्षणाला संरक्षण मिळावे याकरिता राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे आता अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेवर राज्य सरकारची बाजू ऐकून घेऊनच न्यायालय याबाबत निर्णय घेईल. दरम्यान, आता या याचिकेवर राज्य सरकार आपली काय बाजू मांडणार आणि न्यायालय यावर काय निर्णय देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी झाल्यानंतर राज्य सरकारकडून राजपत्र जाहीर करण्यात आले. त्यामुळे आता मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे. मराठा आरक्षणाचा कायदा १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“अभी भी बहुत सुधार बाकी है”, उर्फी जावेदने ट्वीट करत चित्रा वाघांना डिवचले

Aprna

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्याला विरोधक एकवटणार

News Desk

ठाकरे चित्रपट ‘बेस्ट’, गाणी ‘बेस्ट’ म्हणत संजय राऊत यांची मुख्य प्रश्नाला बगल

News Desk