HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : ही श्रेय घेण्याची वेळ नाही !

मुंबई | मराठा आरक्षण मंजूर झाल्यानंतर लगेचच राजकीय पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरु झाल्याचे पहायला मिळत आहे.”मराठा आरक्षणासाठी ४० जणांनी दिलेले बलिदान लक्षात ठेवावे. काही राजकारण्यांकडून याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, ही श्रेय घेण्याची वेळ नाही. आपण केवळ आपली जबाबदारी पार पाडली आहे,” असे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे. दोन्ही सभागृहांमध्ये मराठा आरक्षणाला एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर अजित पवार आझाद मैदानात मराठा उपोषणकर्त्यांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी ते उपोषणकर्त्यांसह बोलत होते.

दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणाचे विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक होत असताना शिवसेनेने उद्धव ठाकरेंच्या दूरदृष्टीमुळेच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्याचे म्हणत सर्व श्रेय घेण्याचा प्रयत्न केला आहे. मराठा समाजाच्या मागण्यांसाठी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे सातत्याने मागण्या केल्यामुळे हे यश मिळाले आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणाचा मार्ग सुखकर झाल्याचे शिवेसनेने म्हटले आहे

“मराठा समाजच्या आरक्षणासाठी सभागृहात आम्ही ८ दिवस तगादा लावल्यानंतर आज अखेर मराठा समाजाच्या आरक्षणाचे हे विधेयक मंजूर झाले. एकूण २८८ आमदारांनी एकमताने या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या आरक्षणाचे श्रेय सर्वांचेच आहे”, असे अजित पवार यांनी म्हटले आहे. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तमाम वर्गांना दिलासा देण्याचा प्रयत्न !

News Desk

खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने सर्वसमावेशक, दिलदार नेतृत्व गमावले! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Aprna

#MarathaReservation : आजपासून संपूर्ण राज्यभरात मराठा आरक्षणाचा कायदा लागू

News Desk