HW News Marathi
राजकारण

मंत्रालय झाले ‘आत्महत्यालय’ – राज ठाकरे

मुंबई | ‘राष्ट्रवादी-काँग्रेस या आघाडी सरकारपेक्षा आमचे सरकार वेगळे दावा करुन भाजपा सरकार सत्तेत आली. खरेच हे सरकार राष्ट्रवादी-काँग्रेस सरकार यांच्यापेक्षा वेगळेच आहे. भाजप सरकारच्या काळात मंत्रालयाचे ‘आत्महत्यालाय’ झाले आहे.’ अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपवर टीका केली.

नागरिक आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात जात होते. पण, भाजपा सरकारच्या काळात आत्महत्या करण्यासाठी मंत्रालयात येतात. शेतकरी धर्मा पाटील यांच्या आत्महत्यानंतर बुधवारी पुन्हा एकदा एका तरुणांने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षात मंत्रालयाच्या दारात आत्महत्या करण्याच्या संख्येत वाढ होता दिसत असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कोण आहेत राष्ट्रवादीचे ३१ प्रवक्ते ?  

News Desk

जोपर्यंत प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत मी आंदोलन करणारच – नारायण राणे

News Desk

#IrrigationScam : चौकशीला सहकार्य करणार, माझा न्यायव्यवस्थेवर संपूर्ण विश्वास !

News Desk