HW News Marathi
राजकारण

भाषण करून न दिल्यामुळे वसंत मोरे पुन्हा नाराज?

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज मुंबईतील नेस्को ग्राउंडवर मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा होणार आहे. या सभे राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी पुन्हा एकदा नाराजी टीव्ही 9 मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. वसंत मोरे यांना पुणे शहरातील मनसेच्या कार्यक्रमात बोलावण्यात आले होते. परंतु, वसंत मोरेंना भाषण करून न दिल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

यापूर्वी वसंत मोरेंना मशिदीवरील भोंग्यांचा मुद्दा न पटल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. यानंतर सातत्याने वसंत मोरे आणि शहर मनसे पदाधिकारी यांच्यातील नाराजी उघडपणे दिसत आहेत.  पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांनी डावल्याने वसंत मोरे नाराज आहे. गेल्या काही दिवसांपासून वसंत मोरे आणि पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये वाद सुरू असल्याची माहिती माध्यमातून मिळाली आहे. या सभे राज ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. मुंबई मनसेचा आज मेळाव्यात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत.

वसंत मोरे नाराजीसंदर्भात प्रतिक्रिया देताना म्हणाले, “मी नाराज नाही, तर माझे कार्यकर्ते नाराज आहेत. काही दिवसांपूर्वी पुणे शहरात शाखा अध्यक्षांचा मेळावा झाला. या मेळाव्यात सर्व कोअर कमिटीचे मेंबर आले होते. परंतु, मी स्टेजवर बसलो असताना ही मला बोलू दिले जाईल, परंतु, मला बोलण्यास दिले नाही. यामुळे माझे कार्यकर्ते माझ्याजवळ आले आणि तात्या आम्ही तुम्हाला ऐकायला आलो आहोत. परंतु, तुम्ही भाषण का केले नाही?, असा प्रश्न विचारला होता. तेव्हा कार्यकर्त्यांना म्हटले की, भाषण देणाऱ्यांच्या यादी माझे नाव नाही. तर मग मी भाषण कसे करणार?”,  असे ते म्हणाले.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विश्वजित कदम यांनी फेटाळल्या भाजप प्रवेशाच्या चर्चा

News Desk

पक्षांतर्गत वाद टाळण्यासाठी शिवसेनेने नाकारले उपमुख्यमंत्रीपद ?

News Desk

काँग्रेसचा पराभव झाला म्हणजे संपूर्ण देश हरला हा कोणता तर्क आहे ?

News Desk