HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारचा क्रांतिकारक निर्णय

नवीदिल्ली | ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक आणि ऍट्रॉसिटी कायद्याला संरक्षण देणारे विधेयक संसदेत मंजूर करणे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकारचे क्रांतिकारक ऐतिहासिक निर्णय असल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.

ऍट्रॉसीटी कायदा शिथिल करणारा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर तो निर्णय रद्द करणारे विधेयक लोकसभेने मंजूर करून ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. देशभरातील आंबेडकरी जनता या निर्णयाने समाधानी झाल्याचे सांगत रामदास आठवले यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.

ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचे विधेयक संसदेने मंजूर केल्याने ओबीसी समाजाने स्वागत केले आहे. या दोन्ही विधेयकांमुळे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे सरकार दलित बहिजनांच्या हितासाठी कार्यरत आहे आणि या समाज घटकांच्या हितासाठी आपण केंद्रसरकार मध्ये खंबीर असल्याचे रामदास आठवले म्हणाले.

ऍट्रॉसीटी कायद्याचे संरक्षण करणारे विधेयक संसदेत मांडावे या साठी आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली होती. असे रामदास आठवले यांनी सांगितले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर विरोधक खोटे आरोप करीत असून दलित बहुजनांच्या हितासाठी मोदी सरकार कार्यरत असल्याचे ऍट्रॉसिटीच्या संरक्षणासाठी मंजूर केलेले विधेयक आणि ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकार ने घेतल्याने विरोधक उघडे पडले आहेत असे ना रामदास आठवले म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पुणे लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या ‘या’ तीन उमेदवारांमध्ये रस्सीखेच

Aprna

#LokSabhaElections2019 : आम्ही लोकांसाठी एकत्र आलो, आम्हाला गोरगरीबांसाठी सत्ता हवी !

News Desk

राज्यासाठी ४५ हजार ९०० कोटींची गुंतवणूक; दावोस दौऱ्यादरम्यान मोठे करार

Aprna
देश / विदेश

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी, गुप्तचर यंत्रणांची माहिती

Gauri Tilekar

श्रीनगर | काश्मीरमध्ये पाकिस्तानचे ४ प्रशिक्षित दहशतवादी सक्रिय असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सप्टेंबरमध्ये जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे दहशतवादी दोन गटांमध्ये काश्मीरमध्ये आले. या गटांमध्ये एकूण ४ प्रशिक्षित दहशतवादी आहेत, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सुरक्षा दलांना दिली आहे. आयएसआयने या दहशतवाद्यांना प्रशिक्षण दिल्याचे देखील म्हटले जात आहे.

काहीच दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये भारतीय जवानांवर झाला होता. या हल्ल्यापासूनच हे स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती मिळत आहे. या स्नायपर्सकडे एम-४ कार्बाइन्स रायफल्स आहेत. या रायफल्सच्या साहाय्याने डोंगरातून हल्ले करणे सोपे जाते.

Related posts

आम्ही दिवे तर लावू, मात्र तुम्ही तज्ज्ञांचे एकदा तरी ऐकावे

swarit

हाथरस प्रकरणाची पुढील सुनावणी २ नोव्हेंबरला

News Desk

आरक्षणांबाबत केंद्राची भूमिका नकारात्मक! – अशोक चव्हाण

News Desk