HW News Marathi
मुंबई

भांडुप ते कांजूरमार्गदरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

मुंबई | मध्य रेल्वेच्या भांडुप-कांजुरमार्ग रेल्वे स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावरून धावणाऱ्या एका लोकलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने सीएसएमटीकडे जाणारी जलद वाहतूक ठप्प झाली आहे. बुधवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा बिघाड झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

मध्य रेल्वे मार्गावर सकाळीच कार्यालयात जाताना बिघाड झाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. कामासाठी घरातून बाहेर पडलेल्या प्रवाशांना लोकल बिघाडामुळे कामावार पोहोचण्यास उशीर होणार आहे. भांडुप-कांजुरमार्ग या मार्गावर हा बिघाड झाला आहे. रेल्वे प्रशासनाकडून सदर घटनेची तातडीने दखल घेण्यात आली आहे. दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून लवकरच वाहतूक पूर्ववत करण्यात येईल अशी रेल्वे प्रशासनाकडून माहिती प्राप्त झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरपीआयचे उमेदवार निलंबित

News Desk

एलएलसी कंपाऊंडला लागली आग

News Desk

उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने केलीआत्महत्या

swarit