HW News Marathi
राजकारण

मोदींनी ५ उद्योजकांचे ३.५ लाख कोटींचे कर्ज माफ केले !

छत्तीसगढ | आज पखनजोर येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींची छत्तीसगढ विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी जाहिर सभा झाली आहे. त्यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा मोदींवर निशाणा साधत वादग्रस्त विधान केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ पासून छत्तीसगढमधील १५ निवडक उद्योजकांचे ३.५ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

मनरेगा योजनेसाठी ३५ हजार कोटींची गरज असताना छत्तीसगढमधील काही उद्योजकांचे १० पटीने कर्जमाफ केले असल्याचे विधान राहुल गांधींनी या सभेत केले. छत्तीसगढमधल्या शेतकऱ्यांसाठी मोदी कृषीकेंद्र बांधणार होते त्याचे काय झाले ? मोदींनी २०१४ पूर्वी केलेल्या आव्हानांचे काय झाले ? असा सवाल राहुल गांधींनी या सभेत केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अदानी समुहातील गैरकारभाराची चौकशी स्वतंत्र एसआयटीमार्फत करावी! –  नाना पटोले

Aprna

हा तर आमचा नैतिक विजय | ममता बॅनर्जी

News Desk

लक्ष्मीकांत खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी

Gauri Tilekar