HW News Marathi
राजकारण

मोदीजी, भारत हा तुमच्या वडीलांची किंवा आजोबांची जहागीर नाही !

नवी दिल्ली | काँग्रेस नेत्यांच्या वक्तव्यावरुन सुरु झालेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वडिलांबाबत केलेला वाद शमण्याचे नाव घेण्याआधीच यात आता आणखी भर पडली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान मोदींच्या वडिलांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. ‘मोदीजी, भारत हा काही तुमच्या वडीलांची किंवा आजोबांची जहागीर नाही. ही लोकशाही आहे. तुम्ही किती दिवस सत्तेत राहाल? ‘ असे वक्तव्य टीआरएसचे नेते आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी हैदराबाद जवळ संगरेड्डी येथे प्रचारसभेला संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले.

भाजप सत्तेत आल्यापासून साडेचार वर्षांत एकदाही चंद्रशेखर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली नव्हती. पण तेलंगणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राव यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे. तेलंगणातील मुस्लिम आणि आदिवासी अत्यंत मागास आहेत. त्यांच्या आरक्षणाचा कोटा वाढवण्यासाठी एक नाही ,दोन नाही तर तब्बल तीस पत्र चंद्रशेखर राव यांनी मोदींना लिहिली होती. पण एकाही पत्राला उत्तर मिळालं नाही. त्यानंतर केंद्रीय मंत्र्याच्या शिफारशीने दिल्लीला जाऊन त्यांनी मोदींची भेट घेतली. आरक्षणाबाबत विचारणा केली असता ‘मी आरक्षणाचा कोटा वाढवणार नाही आणि कोणाला वाढवू देणारही नाही’ अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली. यामुळे निराश झालेल्या चंद्रशेखर राव यांनी देश हा काही तुमच्या वडीलांचीजहागीर नाही असे वक्तव्य केले आहे.

तेलंगणाला तेव्हाच न्याय मिळेल जेव्हा बिगर भाजप, बिगर काँग्रेसचे सरकार केंद्रात येईल, असेही राव यांनी म्हटले. तेलंगणा विधानसभेसाठी ७ डिसेंबरला मतदान होणार असून ११ डिसेंबरला निकाल जाहीर होणार आहेत. टीआरएस पुन्हा आपला गड राखतं का याकडे सगळ्यांचेचं लक्ष लागलं आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहा…मुलींनंतर आता डास पळविणार आमदार राम कदम

News Desk

युद्धात व निवडणुकांत सगळे गुन्हे माफ असतात !

News Desk

“एकनाथ शिंदेंना कोण मुख्यमंत्री मानायला तयार नाही”, संजय राऊतांची बोचरी टीका

Aprna