HW News Marathi
राजकारण

मोदींची सिंगापुर येथील मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड | राहुल गांधी

नवी दिल्ली | कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींना टिकेचे लक्ष केले आहे. सिंगापूर येथील नानयांग तंत्रज्ञान विद्यापीठात पंतप्रधान मोदींची मुलाखत घेण्यात आली होती. ही मुलाखत पुर्णपणे स्क्रिप्टेड असल्याचा टोला राहुल गांधींनी लगावला आहे. राहुल यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हॅंडल वरुन ट्विट करत मोदींवर टिका केली आहे. १ जून रोजी सिंगापूर येथे पंतप्रान नरेंद्र मोदींची मुलाखत घेण्यात आली होती तेव्हा पंतप्रधान मोदींना उपस्थितांनी थेट प्रश्न विचारले होते.

नरेंद्र मोदींच्या सिंगापूर दौऱ्यातील मुलाखतीवर राहुल गांधींनी निशाणा साधला आहे. ‘लोकांनी विचारलेल्या मुक्त प्रश्नांना उत्तरे देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिले पंतप्रधान आहेत. विशेष म्हणजे मोदी काय उत्तरे देणार, हे त्यांच्या दुभाषकाला आधीच माहित होते,’ असा टोला राहुल यांनी मोदींना लगावला आहे. यापुढे बोलताना राहुल गांधी म्हणालेत, ‘बरे झाले, मोदींना खरेच लोकांनी थेट प्रश्न विचारल्या नंतर उत्तरे द्यावी लागली नाहीत, अन्यथा मोदींसमोर पेचप्रसंग निर्माण झाला असता,’ असेही राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विट सोबत राहुल गांधीनी सिंगापूरमधील मोदींच्या मुलाखत कार्यक्रमाचा व्हिडीओ देखील जोडल्याचे पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संसदेच्या अधिवेशनात मोदींची अग्निपरीक्षा

News Desk

पालघरची पोटनिवडणूक चिटींगने जिंकले

News Desk

सरसंघचालकांनी वडीलकीच्या नात्याने राज्यकर्त्यांचे कान उपटायला हवेत | ठाकरे

News Desk
राजकारण

युती शिवाय तयारीला लागा | मुख्यमंत्री

News Desk

मुंबई | पालघर निवडणुकीनंतर शिवसेनेने स्वबळावर लढण्याची घोषणा केल्यानंतर भाजपाकडून युती करण्यासंदर्भात दोन पाऊले पुढे टाकली गेली असतानाही शिवसेनेकडून प्रतिसाद मिळत नसल्याने आता भाजपने सेनेला प्रत्युत्तर दिल्याचे पहायला मिळत आहे. पालघरमध्ये भाजपाला मिळालेल्या यशा नंतर शिवसेनेशी युती नसतानाही आपण जिंकू शकतो त्यामुळे शिवसेना सोबत असो किंवा नसो आगामी निवडणुकीच्या तयारीला लागा असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपाच्या पदाधिका-यांना दिला आहे.

महाराष्ट्रात झालेल्या पोटनिवडणुकीनंतर दादरच्या वसंतस्मृती या भाजपाच्या कार्यालयात भाजपाच्या पदाधिका-यांची बैठक सोमवारी आयोजित करण्यात आली होती. यावेळी पदाधिका-यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आल्यामुळे बैठकीत सत्तेत सहभागी असलेल्या भाजपाचा मित्र पक्ष शिवसेना महत्वाचा चर्चेचा विषय असल्याचे बोलले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांची रणनिती ठरवण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात आली. भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीत पक्षाच्या पदरी अपयश आले असले तरी पालघर मध्ये शिवसेनेशी सामना करताना ही पोटनिवडणूक भाजपाला कठीण जाईल असे वाटत होते. परंतु पालघरमध्ये मिळालेल्या विजयामुळे मित्र पक्ष शिवसेनेशी युती होवो अथवा न होवो आगामी निवडणूकीच्या तयारीला लागा असा सूचना मुख्यमंत्र्यांनी या बौठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Related posts

मनसेतून सेनेत आलेल्या सहा नगरसेवकांना तुर्तास दिलासा

News Desk

काँग्रेसने शेतकऱ्यांना बरबाद केले, पंतप्रधान मोदींची जहरी टीका

News Desk

…तर गल्ली ते दिल्ली सरकार हे एक मोठी सर्कसच आहे | धनंजय मुंडे

News Desk